शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रसंतांच्या साहित्यातील ईश्‍वरीय तत्त्व म्हणजे राष्ट्रभक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:57 IST

बुलडाणा :  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून जीवनाचे सार सांगितले असून, यांना अभिप्रेत धर्म राष्ट्रधर्म होता, त्यांनी व्यवसायनिहाय कर्तव्य व धर्माची भूमिका मांडली.

ठळक मुद्देसाहित्य संमेलनातील परिसंवादात शांताराम बुटे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून जीवनाचे सार सांगितले असून, यांना अभिप्रेत धर्म राष्ट्रधर्म होता, त्यांनी व्यवसायनिहाय कर्तव्य व धर्माची भूमिका मांडली. त्यांनी सांगितलेले ईश्‍वरीय तत्त्व म्हणजे राष्ट्रभक्ती होय, असे ईश्‍वरीय तत्त्व प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीचे मार्गक्रमण केल्यास जीवनाचे सार्थक होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शांताराम बुटे यांनी केले.स्थानिक पंकज लद्दड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड मॅनेजमेंट स्टडिज, बुलडाणा व भारतीय विचार मंच, विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २६ नोव्हेंबर रोजी पार पडले. या साहित्य संमेलनाच्या वंदनीय राष्ट्रसंतांच्या साहित्यातील अध्यात्मबोध या विषयावर दुपार्‍या सत्रात परिसंवाद घेण्यात आला. यावेळी परिसंवादाचा आढावा घेताना सत्राध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या परिसंवादात डॉ.विकास बाहेकर यांनी ग्रामगीतेतील धर्म संकल्पना, प्रा.मोरेश्‍वर देशमुख यांनी राष्ट्रसंताच्या भजनातील ईश्‍वरभक्ती व अरुण नेटके यांनी अतिउच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, या विषयावर विवेचन केले.  यावेळी परिसंवादात सहभागी वक्ते डॉ.विकास बाहेकर यांनी सांगितले, की ग्रामगीतेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेला धर्म हा राष्ट्रधर्म सांगितलेला आहे. जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती या संकल्पनेनुसार वाटचाल करीत असतो; मात्र ग्रामगीतेतील धर्म प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रधर्म शिकविणारा आहे. या धर्मानुसार राष्ट्रधर्मामध्ये व्यवसायनिहाय कर्तव्य करून जीवन जगण्याची भूमिका मांडली आहे. राष्ट्रसंतांनी हा धर्म गाव, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून नवीन प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. परिसंवादात सहभागी दुसरे वक्ते प्रा. मोरेश्‍वर देशमुख यांनी राष्ट्रसंतांच्या भजनातील ईश्‍वरभक्तीविषयी आपले मत मांडताना सांगितले, की प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्‍वरीय तत्त्व आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकामध्ये ईश्‍वरीय तत्त्व बघितले पाहिजे. या ईश्‍वरीय तत्त्वानुसार जीवन व्यथित करणे म्हणजे ईश्‍वरभक्ती होय. अशा राष्ट्रभक्ती शिकविणार्‍या ईश्‍वरभक्तीशिवाय जीवनाचा उद्धार होणार नाही, अशी भूमिका प्रा.देशमुख यांनी मांडली.  तिसरे वक्ते अरुण नेटके यांनी अतिउच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, याबाबत विवेचन करताना जीवनाच्या आश्रमाचे वर्णन केले. यावेळी त्यांनी ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास आश्रमातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्याविषयी माहिती देऊन प्रत्येक व्यक्तीने चांगले जीवन जगण्यासाठी या अवस्थेतील बदलाचा स्वीकार करून परमार्थ साधण्याचे आवाहन केले. यावेळी भारतीय विचार मंचचे प्रा.सुभाष लोहे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन राम सोनुने यांनी केले.  

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजbuldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी