शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 4:29 PM

१७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने १७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. वृक्षतोड सर्रास होत असल्याने जमिनीवरील वृक्षांचे अच्छादन कमालीचे कमी झाले आहे. परिणामी अनियमीत व बेभरवशाचा पावसाळा सुरु झाला आहे. कधी नव्हे असे वाढीव तापमान यावर्षी अनुभवायला मिळाले आहे. निसर्गचक्र कायम ठेवण्यासाठी सन २०१६ मध्ये राज्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. जिल्ह्यास १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले गेले. हे उद्दिष्ट पार पाडल्यानंतर २०१७ मध्ये राज्यात १३ कोटी तर जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० वृक्ष लागवड झाली. २०१८ मध्ये राज्यात ३३ कोटी व जिल्ह्यात ४४९५३७ वृक्ष लागवड चळवळ हाती घेतली गेली. तर यावर्षी ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० रोपे लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत सामाजिक वनीकरणच्या जिल्ह्यातील १७ नर्सरीमध्ये ५० लाख रोपे तयार झाली आहे.प्रशासन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून रोपांची लागवड करण्यात गुंतून गेले आहे. शासनाचे विविध विभाग आणि सर्वच कर्मचारी वृक्षारोपण करणार आहेत. यासाठी आता केवळ ३० ते ४० दिवसांचा अवधी उरला आहे. सामाजिक वनीकरणने आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केली आहे. यातील काही रोपे ४ फुटांपर्यंत वाढली आहेत. जिल्ह्याचे तापमान कमालीचे वाढले असतानाही कोवळी रोपे चांगले तग धरुन आहेत. वृक्ष लागवड मोहिम सुरु झाल्यावर नर्सरीमधील रोपे जिल्हाभर वाटप करण्यात येतील. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग