शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिगावसह बुलडाणा जिल्ह्यातील विकास कामांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 13:20 IST

बुलडाणा: गौण खनिज उत्खननासंदर्भात नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेचा आधार घेत दिलेला स्टे हटवला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमध्ये समाविष्ठ असलेल्या जिगाव प्रकल्पासह अंतिम टप्प्यात आलेल्या तीन प्रकल्पांच्या कामांना आता वेग मिळणार आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा: गौण खनिज उत्खननासंदर्भात नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेचा आधार घेत दिलेला स्टे हटवला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमध्ये समाविष्ठ असलेल्या जिगाव प्रकल्पासह अंतिम टप्प्यात आलेल्या तीन प्रकल्पांच्या कामांना आता वेग मिळणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय हरीत लवादाने केंद्राच्या पर्यावरण, वने तथा जलवायु परिवर्तन मंत्रालयाला १५ जानेवारी २०१६ च्या अधिसुचनेत बदल करण्यास सांगितल्यामुळे रेती घाटांच्या लिलावांसंदर्भात थेट राज्य पर्यावरण समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. मात्र प्रदीर्घ कालावधीपासून रेती घाटांचे रखडलेले लिलाव आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रामुख्याने शुन्य ते पाच हेक्टर क्षेत्रावरील गौण खनिज उत्खननासाठी जिल्हास्तरीय पर्यावरण समिती ऐवजी राज्य पर्यावरण समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यासंदर्भाने ११ डिसेंबर रोजी राष्ट्रीय हरित लवादाने एक अधिसुचना काढली असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी आर. जी. मारबते यांनी दिली आहे. परिणामस्वरुप बुलडाणा जिल्ह्यातील २०१८-१९ साठी सुमारे ९० रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने आता राज्य पर्यावरण समितीकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवावे लागणार आहे. या रेती घाटातून जवळपास एक लाख ब्रास रेती उत्खननासाठी उपलब्ध असून त्याची आॅफसेट प्राईज किमान १४ कोटींच्या घरात जाते. दुसरीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्याचा मायनिंग प्लॉन मे महिन्यात तयार करण्यात आला होता. सोबतच पर्यावरण सल्लागार कंपनीचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नंतर खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेमुळे (११०/२०१८) रेती घाटांच्या लिलावास स्टे मिळाला होता. त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडली होती. मात्र आता ११ डिसेंबरपूर्वी हा स्टे हटविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी आर. जी. मारबते यांनी दिली. त्यामुळे आता रेती घाटांचा लिलाव करताना राज्य पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करून त्यांची मान्यता मिळाल्यानंतर रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. रेती घाटांचे लिलाव रखडल्यामुळे समृद्धी महामार्गासाठी लागणार्या सुमारे नऊ लाख घनमीटर रेतीचा प्रश्नही निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने नागपूर ते मुंबईला जोडणार्या तथा दहा जिल्ह्यातून जाणारा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. या प्रकल्पाचे कामही लवकरच सुरू होणार असल्यामुळे या निर्णयाचा आता फायदा होणार आहे. रेती

अभावी जिगावचे काम ठप्प

रेती उत्खनननावर खंडपीठाचा स्टे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुममध्ये समाविष्ठ असलेल्या व आगामी दोन वर्षात मर्यादीत स्वरुपात प्रकल्पात पाणीसाठविण्याचे उदिष्ठ असलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिगाव प्रकल्पाचे काम जवळपास ठप्प झाले होते. या प्रकल्पासोबतच जिल्ह्यातील अंतिम टप्प्यात आलेल्या काही प्रकल्पांसह चौंडी, दुर्गबोरी प्रकल्पांना फटका बसत होता. गेल्या वर्षीच्या उपलब्ध असलेल्या रेती साठ्यातून जिगाव प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू होते. त्याला आता चालना मिळेल. या व्यतिरिक्त जिल्ह्यात शहरी तथा ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या पूर्णत्वालाही फटका बसत होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जून २०१९ पर्यंत आवास योजनांची कामे पूर्णत्वास करण्यासंदर्भात १५ आॅक्टोंबरच्या बुलडाणा येथील बैठकीत निर्देश दिले होते. त्यालाही याचा फायदा होणार आहे.

गौण खनिज उत्खननावरील खंडपीठाचा स्टे हटला आहे. मात्र राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय पर्यावरण समिती ऐवजी राज्य पर्यावरण समितीकडे रेती घाट लिलावासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावे लागणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.

- आर. जी. मारबते, जिल्हा खनिकर्म अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण