शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

करडी तलावात एक महिना पुरेल एवढाच जलसाठा

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरुच : परिसरातील आठ गावांवर पाणीटंचाईचे संकट.

रुईखेड मायंबा : धाड परिसरातील करडी संग्राहक तलावात दरवर्षीपेक्षा यावर्षी बर्‍या प्रमाणात जलसाठा होता, परंतु जुन महिना संपत आला. तरी पावसाचा पत्ता नाही आणि शेतीसाठी धरणातून पायाचा उपसा सुरुच असल्याने करडी संग्राहक तलावातील जलसाठा झपाटयाने घसरत असून जलसंकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.
धाड जवळ अवघ्या १ कि.मी.अंतरावर करडी संग्रह प्रकल्प असून या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग जवळपासच्या गावातील शेतीसाठी होतो तसेच या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या विहिरी खोदून डोमरुळ, धाड, करडी, कुंबेफळ, कुलमखेड, चांडोळ, सातगांव, सावळी आदी गावांना पिण्याचा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या तलावात बर्‍यापैकी जलसाठा झाला होता. परंतु पावसाळय़ात या तलावाच्या सांडव्याला छिद्र पडल्याने पाण्याचा बराच साठा वाहून गेला. शिवाय सदर तलावातील पाणी शेतीसाठी सुध्दा मोठय़ाप्रमाणावर वापरले जात असल्याने जलसाठा सध्याच्या स्थितीत कमालीचा घटला आहे. अजून १ महिना पाडून न आल्यास पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. या तलावावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या विहिरीच्या पातळीवर सुध्दा घट झाली आहे.
आतापर्यंतचा इतिहास पाहता धाड परिसरातील चांडोळ व धाड या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होत होते. पिण्याच्या पाण्यासाठी आया बहिणींना भटकंती करावी लागत होती.
मात्र या तलावामुळे ही भटकंती जरा थांबली असली तरी योग्य नियोजना अभावी यावर्षी देखील टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तसेच दरवर्षी जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस पडला की गुरांना हिरवा चारा खायाला मिळत असे परंतु पाऊस लगेच कमी पडल्याने आणि लगेच उघडल्याने गुरांना हिरवा चारा सुध्दा मिळत नसल्याने त्यांना खाऊन टाकलेली उस्टाळ पुन्हा खाण्याची पाळी आली आहे. जर पाण्याचे योग्य नियोन झाले नाही तर पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेले धाड, चांडोळ या गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते एवढे मात्र खरे.