शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

नमामी गंगे अभियानातून जिल्हाभरात जलक्रांती  होणार : माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:21 IST

बुलढाणा : नदी, नाले ओढ्यांची साफसफाई, स्वच्छता तसेच भविष्यातील नदीजोड प्रकल्प अभियान गावपातळीवर राबविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, राज्यात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद या उपक्रमासाठी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविस्तारीत कार्यकारीणीची झाली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलढाणा : नदी, नाले ओढ्यांची साफसफाई, स्वच्छता तसेच भविष्यातील नदीजोड प्रकल्प अभियान गावपातळीवर राबविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, राज्यात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. नमामि गंगे अभियानातून जिल्हाभरात जलक्रांती निर्माण होणार असून आपल्या भागातील नदी प्रकल्पाची माहिती तातडीने कळवावी, असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री तसेच नमामि गंगे अभियानाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ माळी यांनी पाच नोव्हेंबर रोजी विश्रमागृहावर आयोजित विस्तारीत कार्यकारीणी बैठकीत केले.या बैठकीला नामामि गंगेचे पश्चिम विदर्भ सह सदस्य शाम देवडे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिवाजीराव खरात, अरविंद शिंदे, दत्ता पाटील, तसेच जिल्हाभरातील नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्ह्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विश्वनाथ माळी म्हणाले, नामामि गंगे अभियान गाव पातळीवर नदी नाले स्वच्छ करून शेती व शेतकºयांसाठी सिंचन सुविधा तसेच दुष्काळग्रस्त भागात पेयजल संकट दूर करण्यासाठी भविष्यात नदीजोड  प्रकल्प ही लोकचळवळ करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासोबतच सिंंचन क्षमता वाढविण्यासाठी  या योजनेवर निधी उपलब्ध करून दिला आहे. नदीचे व धरणांचे रुंदीकरण, तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. तापी ते बुद्धनेश्वर, पाताळगंगा ते नळगंगा, मेहकर तालुक्यातील महत्वाकांक्षी  प्रकल्प तसेच सिंंदखेड राजा तालुक्यातील आमना धामना नदी प्रकल्पासह प्रकल्प केंद्रीय जलसंपदा विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.राज्यातील नदीजोड प्रकल्पातंर्गत २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्टÑसाठी नदीजोड  प्रकल्पातंर्गत २४ हजार कोटी  रूपयांची तरतुद केली असल्याचे सांगून नमामि गंगेत बुलढाणा जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी खेचून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुकास्थानी गावपातळीवर सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगर सेवक यांना या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून जलक्रांती निर्माण करावयाची असल्याने सर्वांनी एकत्र येण्ची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रमुख पाहूणे म्हणून नमामि गंगेचे पश्चिम विदर्भ सहसदस्य शाम देवडे पाटील यांनी नमामि गंगे या अभियानाचे महत्त्व गाव पातळीवर कार्यकर्त्याच्या  मार्फत सांगून लोकचळवळ उभी करण्यासाठी प्रत्येक गावात नमामि गंगेची शाखा गठीत करावी. तसेच प्रत्येक गावात कार्यकारिणीचे फलक लावावे. आपल्या भागातील नद्यांची माहिती संकलीत करून या अभियानात जलसंकटावर मात करण्यासाठी सहभागी व्हावे, तसेच या अभियानाची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना त्यांनी दिली.जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिवाजीराव खरात यांनी नमामि गंगेची सविस्तर विस्तृत माहिती दिली. प्रास्ताविकात दत्ता पाटील यांनी जिल्हाभरातील  तापीनदीचे पाणी सवडद बारा पर्यत आणून बुधनेश्वर येथे पैनगंगेच्या उगमात सोडण्याचा प्रकल्प तसेच पलढग धरणातील पाणी पाताळगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प या संदर्भात माहिती दिली. विस्तारीत बैठकीला नमामि गंगेचे जिल्हा सरचिटणीस अनंत खेकाळे, अर्जूनराव वानखेडे, सखाराम नरोटे, साहेबराव गवते, अ‍ॅड. दशरथसिंह राजपूत, प्रकाश पडोळ, गणेश जवरे, मंगेश सातव, किशोर गवळी, अशोक राजपूत, कृष्णा लकडे, महादेवराव देशमुख, राजेंद्र बोचरे, किशोर जामदार, विकास वानेरे, सुनील शेवाळे, प्रकाश म्हस्के, केशव बाहेकर, विजय मापारी, गणेश तंगडे, गोपाल राजपूत, अमोल बारवाल, राजेश वानखेडे, समाधान वाघ, ओम भुसारे, गोंविद चव्हाण, कुमोदिनी कोलते, सुनीता तिडके, समीर भालेराव, नितीन दासार, रवी पाखरे प्रामुख्याने उपस्थित होते. आभार शहराध्यक्ष गिरीष किन्हीकर यांनी मानले.

टॅग्स :riverनदीWaterपाणीBJPभाजपा