शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शेतकऱ्यांभोवती परराज्यातील भांडवलदारांचा पाश; अवैध सावकारीचा नवा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 16:51 IST

- अनिल गवई खामगाव: आर्थिक बाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांना पीक तारणावर कर्ज देण्याचा नवा फंडा परराज्यातील भांडवलदारांनी अवलंबिला आहे. परराज्यातील सावकार बियाणांसोबतच पैसे देत, शेतकऱ्यांकडून व्यवहार करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. घाटाखालील विविध तालुक्यांमध्ये पर राज्यातील भांडवलदारांनी पाश आवळला आहे.एरवी कोणतेही सोंग घेता येत असले, तरी पैशाचे सोंग घेता येत नाही. ...

ठळक मुद्देशेतक-यांचा आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी परराज्यातील काही भांडवलदार घाटाखालील तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत.शेतातील पीक तारण घेवून पैसे वाटण्याचा प्रकार काही ठिकाणी घडत असून शेतकऱ्यांभोवती एक नवा पाश यानिमित्त्ताने आवळल्या जातोय. हंगामात ठरलेल्या दराने पैसे परत केले नाही, तर  आलेले पीक घेवून जाणार असल्याच्या अटीवर हा व्यवहार करण्यात येत आहे.  

- अनिल गवई खामगाव: आर्थिक बाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांना पीक तारणावर कर्ज देण्याचा नवा फंडा परराज्यातील भांडवलदारांनी अवलंबिला आहे. परराज्यातील सावकार बियाणांसोबतच पैसे देत, शेतकऱ्यांकडून व्यवहार करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. घाटाखालील विविध तालुक्यांमध्ये पर राज्यातील भांडवलदारांनी पाश आवळला आहे.एरवी कोणतेही सोंग घेता येत असले, तरी पैशाचे सोंग घेता येत नाही. त्यामुळेच आर्थिक बाबतीत खचलेल्या  माणसाचा गैरफायदा सहज घेता येतो. सध्या सर्वात जास्त आर्थिक परिस्थिती जर कोणाची खराब असेल, तर ती शेतक-यांची.  म्हणूनच अशा अनेक शेतक-यांचा गैरफायदा घेण्यासाठी परराज्यातील काही भांडवलदार घाटाखालील तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत. शेतातील पीक तारण घेवून पैसे वाटण्याचा प्रकार काही ठिकाणी घडत असून शेतकऱ्यांभोवती एक नवा पाश यानिमित्त्ताने आवळल्या जातोय. विशेष म्हणजे यातील काही जण बियाणे मार्केटिंगच्या निमित्तानेही  शेतक-यांशी संपर्क ठेवून आहेत. त्यामुळे बोगस बियाणेही शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जाण्याची शक्यता आहे.  गेली दोन-तीन वर्षे असलेली दुष्काळी परिस्थिती तसेच शेतमालाला नसलेले भाव यामुळे शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. बोटावर मोजण्याइतके सधन कास्तकार सोडले तर आर्थिक तंगीने पिचलेल्या शेतक-यांची संख्याच अधिक आहे. याला सरकारी धोरणही जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे हक्काचे पैसेही त्यांना मिळत नाहीत. शासकीय तूर व हरभरा खरेदीचे पैसेही शेतकऱ्यांच्या कामी पडताना दिसत नाहीत. घाटाखालील  हजारो शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी तूर विक्रीसाठी आणली. यातही अनेक अडचणी आल्या. शेवटी ७० दिवस खरेदी सरू राहीली. त्यानंतर खरेदी बंद झाल्याने माल तसाच पडून राहिला. हरभऱ्याचेही तेच झाले. शेवटी क्विंटलमागे १ हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहिल्याने व बाजारात भाव नसल्याने पेरणीसाठी करण्यात आलेले हे एकमेव नियोजनही फेल गेले.  परिणामी,  सध्या अनेक शेतकऱ्यांकडे पैसाच शिल्लक नाही. जो-तो आपापल्या परीने जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आंध्रप्रदेश व कर्नाटक सह काही राज्यातून अवैध सावकारी करण्याच्या उद़देशाने काही भांडवलदार खामगाव तालुक्यातील निपाणा, बोरजवळा, निमकवळा, रोहणा, वर्णा, शेगाव तालुक्यातील जलंब, माटरगाव,  संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर, टुनकी, सोनाळा, जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, हनवतखेड, पळशी सुपो भेंडवळ, नांदुरा तालुक्यातील जिगाव, अलमपूर, निमगाव तसेच मलकापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दाखल झाले आहेत. 

 पीक घेवून जाणार असल्याची अट!आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या शेतक-यांना ते आपल्या पाशात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. नगदी पैसे देताना शेतीमधील पीक तारण म्हणून मागत आहेत. हंगामात ठरलेल्या दराने पैसे परत केले नाही, तर  आलेले पीक घेवून जाणार असल्याच्या अटीवर हा व्यवहार करण्यात येत आहे.   व्याज आकारणीबाबत स्पष्टता नाही!शेतक-यांना भांडवलदारांकडून पैसे देण्यात येत असले, तरी त्यावर किती व्याज आकारण्यात येते, याबाबत स्पष्टता नाही. साधारणपणे ५ ते १० टक्के व्याज आकारण्यात येत असल्याची माहिती आहे. शेतक-यांच्या शेतातील पीकच तारण असल्याने शेवटी जो हिशेब होईल, त्याप्रमाणे येणारी रक्कम ही शेतक-यांना द्यावीच लागणार आहे. हाताशी पैसा नसल्याने अनेक शेतकरी अशा नव्या सावकारीचे शिकार होत आहेत.   गटशेतीबाबत शेतकºयांशी संपर्क ठेवून असणा-या  कंपन्यांचे प्रतिनिधी बºयाचदा ये-जा करतात.  परंतु याव्यतिरिक्त जर कोणी शेतक-यांचे शोषण करत असेल, तर अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल. असा प्रकार घडत असल्यास शेतकºयांनीही तक्रारींसाठी पुढे यावे.- एम.आर. कृपलानी, उपनिबंधक, खामगाव.

 गावात काही कंपन्यांचे लोक येत आहेत. बियाणांसोबतच पैशांबाबतही विचारणा करीत असून, काही कागदपत्र घेवून पेरणीसाठी मदत करीत आहेत. पिकयेईपर्यंत पैसे परत न केल्यास पिक द्यावे लागेल, असा करार त्यांच्याकडून केला जात आहे.- जनार्दन कळस्कार, शेतकरी, वर्णा 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीMONEYपैसा