शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांपैकी किती लोक सातबाराधारक?

By admin | Updated: July 14, 2017 00:45 IST

नावे जाहीर करण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मला कर्ज माफी मिळाली, असे फलक घेऊन आंदोलन करणाऱ्यांपैकी किती जणांच्या नावावर शेतीचा सात-बारा आहे व त्यापैकी किती जणांना कर्ज माफी मिळाली आहे, असा सवाल आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्टिटरद्वारे उपस्थित केला असून, जिल्हा भाजपाने कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याची तारीख जाहीर करावी, असेही आवाहन केले आहे. माझी कर्ज माफी झाली नाही, या विषयावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने बुलडाण्यापासून राज्यस्तरीय ‘एल्गार’ पुकारला. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यातून या आंदोलनाचा बिगूल वाजला. त्यावेळी या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या प्रदेश अध्यक्षांच्या वाहन ताफ्यासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मला कर्जमाफी मिळाली, असे फलक दर्शवित घोषणाबाजी केली होती.दरम्यान, गुरुवारला आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्टिटरद्वारे भाजप आंदोलनातल्या बोर्ड हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांपैकी कितींच्या नावावर सात-बारा आहे व त्यापैकी किती जणांची कर्जमाफी झाली आहे, नावे जाहीर करावे, असे व्टिट केले आहे. सोबतच दुसऱ्या एका व्टिटमध्ये मला कर्जमाफी मिळाली, असे फलक मिरवणाऱ्या बुलडाणा जिल्हा भाजपने कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांचा त्वरित मेळावा आयोजित करून मेळाव्याची तारीख जाहीर करण्याचे आवाहनसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. पोलीस कारवाईस सामोरे जाण्यास तयार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याबाबत बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गुन्हे दाखल झाल्याचे कळल्यानंतर नियोजित दौऱ्यानुसार, प्रदेश अध्यक्षांसोबत शेगाव येथे न जाता स्वत:ला अटक करून घेण्याकरिता आपण थेट बुलडाणा पोलीस स्टेशन गाठले होते. आपल्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून, दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने मला अटक करावी, अशी मागणी केली होती. तथापि पोलीस प्रशासनाने चौकशी, पुरावे व गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता अटक करण्यास असमर्थता दर्शविली. आरोपांबद्दल विचारले असता, सार्वजनिक जीवनात काम करताना आया-बहिणी, लेकी-बाळी जर असे गंभीर आरोप करीत असतील तर हा विषय बोलण्यापलीकडचा असल्याचेसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच फिर्यादींनी व्यक्तीश: केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने पुरावे पोलिसांना सादर करावे. त्या अधारावर आपल्यावर होणाऱ्या पोलीस कार्यवाहीस आपण तयार असल्याचेसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. शांतता व सलोखा कायम रहावा, ही भारतीय संविधानाचा एक पाईक व भारतीय नागरिक म्हणून आपली नेहमी भूमिका असते. जयस्तंभ चौकात एकीकडे हजारोच्यावर काँग्रेस कार्यकर्ते व दुसरीकडे भाजपाचे मोजके निदर्शनकर्ते तसेच अत्यल्प पोलीस बळ लक्षात घेता उद्भवणारी संभाव्य परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, त्याकरिताच आपण तिथे थांबून कार्यकर्त्यांना शांततेने कार्यक्रमाच्या ठिकाणी जावे, ही भूमिका पार पाडल्याचे सर्वश्रुत आहे, असे सुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.