शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

दमदार पावसाने येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 1:14 PM

बुलडाणा : आठवड्यापासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आठवड्यापासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात सतत पाऊस झाल्याने पाच दिवसात पैनगंगा नदीला चार वेळेस पूर आला. धरण पुर्ण भरल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बुलडाणेकरांची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.बुलडाणा शहरासह परिसरातील गावाला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. धरणाची पाणी साठवण क्षमता १२.४० दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात पाऊस झाला की, धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होते. २६ जूनच्या रात्री बुलडाणा तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने पैनगंगेला पूर आला. साखळी बु.मंडळात ८३ मिमी, धाड ८१ मिमी , देऊळघाट ७३ तर म्हसला बु. मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. अंभोडा, उमाळी, हतेडी खुर्द, कोलवड, सागवन, दुधा, देवपूर, देऊळघाट, धाड, बोरखेड, साखळी बु., साखळी खुर्द, अंत्री तेली गाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले. मात्र मुसळधार पावसाने येळगाव धरण १०० टक्के भरले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र बुलडाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाही. तर यावर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येळगाव धरण १०० टक्के भरल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. बुलडाणेकरांना दरडोई १०० लीटर याप्रमाणे दररोज ७० लाख लीटर पाणी लागते. परिसरातील गावांनाही येळगाव धरणातूनच पाणीपुरवठा होतो. येळगाव धरणातून प्रतिदिन ९० लाख लीटर पाण्याची उचल होते. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येळगाव धरणातील गाळ काढण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढली. काढलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकल्याने परिसरातील शेताची सुपिकता वाढली.आजूबाजूच्या गावांची भागणार तहानयेळगाव धरणातून अजिसपूर, नांद्राकोळी, साखळी बु., सागवन, कोलवड, देऊळघाट, बिरसिंगपूर, येळगाव, सुंदरखेड, भादोला, माळविहिर, अंत्री तेली, जांभरुणला येळगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. ऐन उन्हाळ्यात व दुष्काळी परिस्थिती असतांनाही येळगाव धरणामुळे या गावांची तहान भागविली गेली. यावर्षी जूनमध्येच धरण १०० टक्के भरल्याने या गावातील नागरिकांची वर्षभर तहान भागविली जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण