शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत!

By admin | Updated: May 24, 2017 00:19 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष: एक महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कमहारचिकना : लोणार तालुक्यातील महारचिकना या गावात भीषण पाणीटंचाई असून, प्रशासन गावाकडे दुर्लक्ष केले असल्याचे जाणवत आहे. गावात मागील एक महिन्यापासून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे, तसेच पाणीटंचाई असल्यामुळे विहिरीवर महिलांना पाणी भरण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावात दोन-तीन हातपंप असून, त्यातून आठ-दहा हंड्यांच्यावर पाणी निघत नाही. त्यातही रात्री-बेरात्री लोकांना पाणी भरण्यासाठी उठावे लागते. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरी आहेत; परंतु त्या विहिरींना रोज १० ते १५ मिनिटाच्यावर मोटारपंप चालत नाही. त्यामुळे गावाला पाणीटंचाईचे मोठे चटके सहन करावे लागत आहेत. त्यातसुद्धा गावातील विहिरीत पाणी सोडल्या जाते. त्या ठिकाणी महिला- पुरुषांची पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडते. त्यात पाणी भरत असताना कुणाचा धक्का जरी लागला तर विहिरीत पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याही परिस्थितीत महिला जीव धोक्यात टाकून विहिरीवर पाणी भरतात. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून गावाला पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचा प्रस्ताव तहसीलदार लोणार यांच्याकडे पाठविला आहे. तरी गावात लवकर टँकर सुरू करून किंवा कुणाची विहीर अधिग्रहित करून गावात पाणीपुरवठा करण्यात येईल.- सुमन संभाजी नागरे,सरपंच, महारचिकना, ता. लोणार.