शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

विहीर अधिग्रहणाच्या रकमेपासून शेतकरी वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:14 IST

नांदुरा: सतत दोन वर्षांच्या कमी पावसामुळे जिल्हय़ात मागील  वर्षात बहुसंख्य गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती.  पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हाभरातील तब्बल ४५९ गावांमध्ये  ५७७ ठिकाणी विहीर, बोअरवेलसारख्या पाण्याच्या स्रोतांचे शे तकर्‍यांकडून अधिग्रहण करून गावाला पाणी उपलब्ध करून  देण्यात आले. याकरिता प्रतिदिवस ४00 रुपये मोबदलाही  शासनातर्फे देण्यात येतो; परंतु मागील वर्षभरातील अधिग्रहणाचा  शेतकर्‍यांना एक रुपयाही मिळाला नसून, जिल्हय़ाची तब्बल २  कोटी ५0 लाख रुपयांची थकबाकी शासनाकडे आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणार्थ जिल्हय़ातील ४५९ गावांमधील ५७७  विहीरी केल्या अधिग्रहितपाण्याचे स्त्रोत अधिग्रहणापोटी मिळणार्‍या मोबदल्यापासून शे तकरी वंचित

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: सतत दोन वर्षांच्या कमी पावसामुळे जिल्हय़ात मागील  वर्षात बहुसंख्य गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती.  पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हाभरातील तब्बल ४५९ गावांमध्ये  ५७७ ठिकाणी विहीर, बोअरवेलसारख्या पाण्याच्या स्रोतांचे शे तकर्‍यांकडून अधिग्रहण करून गावाला पाणी उपलब्ध करून  देण्यात आले. याकरिता प्रतिदिवस ४00 रुपये मोबदलाही  शासनातर्फे देण्यात येतो; परंतु मागील वर्षभरातील अधिग्रहणाचा  शेतकर्‍यांना एक रुपयाही मिळाला नसून, जिल्हय़ाची तब्बल २  कोटी ५0 लाख रुपयांची थकबाकी शासनाकडे आहे.दरवर्षी संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा कृती आराखडा पंचायत  समिती स्तरावर तयार करण्यात येऊन जि.प.ची त्यास मान्यता  घेण्यात येते. साधारणत: सप्टेंबर-ऑक्टोबरपासून जसजशी  टंचाई जाणवेल त्याप्रमाणे विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण  करण्यात येते. सदर अधिग्रहण ३0 जूनपर्यंत असते. ज्या शे तकर्‍यांच्या विहिरीवरून पाणी घेण्यात येते त्यास मोबदला म्हणून  ४00 रुपये प्रति दिवस देण्यात येतो. ३0 जूनपर्यंत अधिग्रहणाची  मुदत असली तरी पावसाळा लांबल्याने त्यानंतरही पाणीटंचाई  असतेच.मागील २0१६-१७ या वर्षात जिल्हय़ात एकूण ४५९ गावांमध्ये  ५७७ ठिकाणी विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले;  परंतु अद्याप या अधिग्रहणाच्या मोबदल्यातील रुपयाही शे तकर्‍यांना मिळाला नसल्याने येत्या काळात टंचाई जाणवल्यास  सदर शेतकरी अधिग्रहणाबाबत उदासीन असून, यावर्षी काही  तालुक्यांमध्ये मागील वर्षीपेक्षाही जास्त पाणीटंचाई जाणवू शक ते. त्यामुळे मागील वर्षीचा अधिग्रहणाचा मोबदला शेतकर्‍यांना  तत्काळ मिळणे गरजेचे आहे.  जिल्हाभरातील शेतकर्‍यांचे अधिग्रहणाचे पैसे बाकी असून, ही  रक्कम कोटींच्या घरात आहे. त्यामुळे येणार्‍या दिवाळीपूर्वी ही  रक्कम शेतकर्‍यांना मिळाल्यास त्यांची दिवाळी आनंदात साजरी  होईल. सध्या वाढलेल्या भारनियमनामुळे यावर्षी टंचाईग्रस्त  गावांमध्ये अधिग्रहण झालेही तर पाणी मिळेल की नाही, शंका  आहे. बर्‍याच ठिकाणी टँकर लावण्याची आवश्यकता भासणार  आहे. पाण्याची पातळी वाढली नसून, उलट घटली आहे. 

अधिग्रहणाच्या थकीत रकमेची शासनाकडे मागणी केलेली  असून, पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून निधी मिळताच सर्व  पंचायत समित्यांना त्वरित निधी वितरण करण्यात येईल. वर्ष  २0१७-१८ करिता  टंचाईग्रस्त गावांचा कृती आराखडा तयार  करण्याचे काम सुरू आहे.-दिनकर घुगे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प.

१ जानेवारी २0१७ पासून ३0 जूनपर्यंत गावाला बोअरवेलवरून  पाणीपुरवठा करूनही मंजुरी १ एप्रिल ते ३0 जूनपर्यंतच मिळाली  आणि असे असूनही अद्यापही बोअरवेलच्या अधिग्रहणाचा एक  रुपयाही मिळाला नाही.- सोपान जानराव खवले, शेतकरी, हिंगणा भोटा.