शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

जिल्ह्यातील १४१९ गावांत दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:52 IST

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद या पिकांचे अतिपावसाने नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागात पूर आल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून ...

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद या पिकांचे अतिपावसाने नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागात पूर आल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. दरम्यान, सोयाबीन पीक चांगले असल्याने शेतकऱ्यांना या पिकाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असतानाच अति पाऊस झाला, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोंगून टाकलेले सोयाबीन भिजले. काहींच्या सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या, तर अनेकांच्या सोयाबीनच्या पिकाला काेंब आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीनंतर प्रशासनाकडून तातडीने सर्व्हे करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ मधील अंतिम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ४१९ गावांची ५० पैशांच्या आत अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे आली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.

यांना मिळतो लाभ

दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त गावांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध सवलती देण्यात येतात. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत शिथिलता आदी लाभ देण्यात येतो.