शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

जिल्ह्यातील १४१९ गावांत दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:52 IST

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद या पिकांचे अतिपावसाने नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागात पूर आल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून ...

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद या पिकांचे अतिपावसाने नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागात पूर आल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. दरम्यान, सोयाबीन पीक चांगले असल्याने शेतकऱ्यांना या पिकाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असतानाच अति पाऊस झाला, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोंगून टाकलेले सोयाबीन भिजले. काहींच्या सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या, तर अनेकांच्या सोयाबीनच्या पिकाला काेंब आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीनंतर प्रशासनाकडून तातडीने सर्व्हे करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ मधील अंतिम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ४१९ गावांची ५० पैशांच्या आत अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे आली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.

यांना मिळतो लाभ

दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त गावांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध सवलती देण्यात येतात. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत शिथिलता आदी लाभ देण्यात येतो.