शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कृषीपुरक व्यवसायासाठीही आता खेळत्या भांडवलावर पतपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:42 IST

बुलडाणा: अलिकडील काळात पीकर्ज वाटपाचा घटलेला टक्का पाहता आता पीककर्जाअंतर्गतच कृषीपुरक व्यवसायासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना एक लाख ६० हजार  रुपयापर्यंत पतपुरवठा केल्या जाणार आहे. द

- नीलेश जोशी बुलडाणा: अलिकडील काळात पीकर्ज वाटपाचा घटलेला टक्का पाहता आता पीककर्जाअंतर्गतच कृषीपुरक व्यवसायासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना एक लाख ६० हजार  रुपयापर्यंत पतपुरवठा केल्या जाणार आहे. दरम्यान, त्यानुषंगाने रिझर्व बँकेसह नाबार्डने अनुक्रमे सात आणि १३ फेब्रुवारी रोजी एका परिपक्षत्रकान्वये निर्देश जारी केले आहेत. दरम्यान, जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीने चार एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून त्याबाबतचे कर्ज दर निश्चित केले आहेत. विशेष म्हणजे या शेतकर्यांना उपरोक्त मर्यादेपर्यंत तारण देण्याची अवश्यकता राहणार नसल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले आहे.मात्र एक लाख ६० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा पतपुरवठा शेतकर्यांना करताना त्यांच्याकडून तारण घेतले जाणार आहे. तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत हा पतपुरवठा केला जाणार असल्याचे नाबार्डच्या  सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. कृषी पुरक व्यवसायामध्ये प्रामुख्याने पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योगासाठी हा पतपुरवठा केला जाणार आहे.आचार संहितेच्या कटाच्यात अडकलेला जिल्ह्याचा तीन हजार ८७५ कोटी रुपयांचा वार्षिक पतआराखडा २४ एप्रिल रोजी जाहीर झाला असून खरीपासाठी यात एक हजार ७७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातंर्गत तीन लाख ७१ हजार ७२ शेतकर्यांना यंदा पीककर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आलेले आहे. मात्र २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षात पीककर्ज वाटपाचा टक्का हा अनुक्रमे २६.१३ आणि ३४.१५ टक्केच राहला आहे. त्यामुळे वार्षिक पतआराखड्यात कृषी क्षेत्राचा वाटा ९५ टक्के असणार्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ही बाब धोकादायक ठरणारी आहे. त्यातच गेल्या १८ वर्षात जिल्ह्यात दोन हजार ७५५ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी पाहता जिल्हा अग्रणी बँकेने हा मुद्दाही अधिक गांभिर्याने घेतला आहे. त्यामुळे शेती पुरक व्यवसायासाठी स्वतंत्रपणे पतपुरवठ्याचे लक्षांक निश्चित करण्यात आले नसले तरी पीककर्जाअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना पतपुरवठा करण्याबाबच्या सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत.

दीड लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी लागणार तारणहा पतपुरवठा करताना एक लाख ६० हजार रुपयापर्यंत अल्प व अत्यल्प भूधारकांना तारण देण्याची गरज राहणार नाही. किसान क्रेडीट कार्डअंतर्गत त्यांना गरजेनुसार पतपुरवठा मिळू शकणार आहे. मात्र त्यापेक्षा अधिक व तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतचा पतपुरवठा घेताना तारण द्यावे लागणार आहे. जिल्ह्यात दोन लाख ८५ हजारांच्या आसपास किसान क्रेडीट कार्डधारक शेतकरी आहे. त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. त्यांच्या वर्किंग कॅपीटल अर्थात खेळत्या भांडवलाच्या आधारावर किंवा त्यांच्याकडे असलेल्या गुरे तथा तत्सम पशुंच्या एककाच्या आधारावर हा पतपुरवठा केला जाऊ शकतो, असे नाबार्ड तथा जिल्हा अग्रणी बँकेच्या सु६ांनी सांगितले. शेती नसलेले परंतू शेती पुरक व्यवसाय करणारे स्वतंत्रपणे यासाठी कर्जाची मागणीही करू शकतात. याबाबत जिल्ह्यातील बँकांनाही सुचना दिल्या गेल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले.

अशा पद्धतीने होऊ शकतो पतपुरवठातपशील        युनीट        तज्ज्ञ समितीने शिफारस केलेले कर्जदरदुग्ध व्यवसाय        १ जनावर        १४,००० रुपयेछोटे रवंथ करणारी गुरे    १०+१        १२,१००मत्स्यपालन        प्रती हेक्टर        ४५,०००कुकुटपालन        -------        ------मांसाळ पक्षी        १०० पक्षी        १६,०००अंडी देणारे पक्षी        १०० पक्षी        ३०,०००रेशीम उद्योग        प्रती हेक्टर        ४५,०००

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज