शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळात वाढली पशुपालकांची चिंता; गुरे ठरताहेत तोंड, पाय खुरी रोगाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:58 IST

बुलडाणा: अनेक ठिकाणी गुरे तोंड व पाय खुरी या रोगाचे शिकार ठरत आहेत. थंडीमुळे आजारांचे प्रमाण वाढले असून जिल्ह्यात १० लाख २० हजार ३६ गुरांना या आजाराचा धोका निर्माण झाला आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: अनेक ठिकाणी गुरे तोंड व पाय खुरी या रोगाचे शिकार ठरत आहेत. थंडीमुळे आजारांचे प्रमाण वाढले असून जिल्ह्यात १० लाख २० हजार ३६ गुरांना या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळत असल्याने दुष्काळात पशुपालकाची चिंता वाढली आहे. बदलत्या हवामानामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही चांगला वा विपरीत परिणाम जाणवत असतो. ऋतुमानानुसार गुरांच्या समस्या वेगवेगळ्या आढळून येतात. अतिथंडीचाही जनावरांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. पर्यायाने उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट येते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त होणाºया थंडीने केवळ मानवांनाच नव्हे, तर जनावरांनाही त्रास सोसावा लागत आहे. या वाढत्या थंडीमुळे गुरांना विविध आजारांचा समाना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत, मात्र पशुसंवर्धन विभागाकडून वेळेवर योग्य ते लसीकरण केल्या जात नसल्याने गुरांना वेगवेगळ्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्याती काही ठिकाणी जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळून येत आहेत. गुरांना पाय व तोंड खुरी येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या आजारांचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो. गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग या गोष्टी सर्वसामान्यपणे खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतात. गाय, म्हैस, बैल यासह वासरांनाही या तोंड व पाय खुरी रोगाने ग्रासले आहे. जिल्ह्यात एकूण पशुधन संख्या १० लाख २० हजार ३७ आहे. त्यात गायवर्ग व म्हैसवर्ग ५ लाख ६७ हजार ७३३, लहान पशुधन (वासरे) गायवर्ग व म्हैसवर्ग ६१ हजार २५७ आहेत. तर शेळी वर्ग १ लाख ७ हजार ३० व मेंढी वर्ग १० लाख २० हजार ३७ आहे. या संपुर्ण गुरांच्या अरोग्याच्यादृष्टीने जिल्ह्यात लसीकरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.

वासरू दगावले

मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथे अनेक गुरांना सध्या पाय व तोंड खुरीचा रोग झाला आहे. ऊमरा देशमुख येथील श्रीकांत वानखेडे यांच्या मालकीच्या गायीला मागील आठवड्यामध्ये तोंड व पाय खुरीचा आजार बळावला होता. दरम्यान, त्या गायीच्या वासरालाही हा रोग झाल्याने त्या वासराचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान पशुधनांना धोका जास्त

मोठ्या पशुधनाला पाय व तोंड खुरीचा आजार आल्यास उपचारानंतर ते बरे होऊ शकतात. मात्र लहान पशुधनांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना या आजाराचा सामना करात येत नाही, त्यामुळे लहान पशुधनाला (वय एक वर्षपर्यंत) या आजारांचा धोका जास्त असतो. सध्या जिल्ह्यात असे लहान लहान पशुधन (वासरे) गायवर्ग व म्हैसवगाची संख्या ६१ हजार २५७ आहे.

थंडी वाढल्याने त्याचा गुरांवर परिणाम जाणवतो. त्यामध्ये खुरी रोगांचे प्रमाण वाढू शकते. ज्या गावांमध्ये गुरांना तोंड व पाय खुरीची लागन झाली आहे, अशा ठिकाणी तातडीने शिबीर घेऊन गुरांवर उपचार करण्यात येतील.

- डॉ. जी. आर. गवई, पशुधन विकास अधिकारी, मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी