शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

‘हेअर कट’द्वारे बँकांकडूनही शेतकरी कर्जमाफीला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 1:59 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पोटी ९५ कोटी ६६ लाख ५६ हजार ८६९ रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘हेअर कट’द्वारे बँकांकडूनशेतकरी कर्जमाफीला हातभार लागणार असून आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर कर्जमुक्ती मिळालेल्याकाही शेतकऱ्यांच्या खात्यात तुलनेने कमी रक्कम जमा झाल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पोटी ९५ कोटी ६६ लाख ५६ हजार ८६९ रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती आहे.राज्य शासन शेतकºयांच्या कर्जाची रक्कम बँकांना देत आहे. त्यामुळे बँकामधील शेतकºयांची जी खाती ३० सप्टेंबर २०१९, ३१ मार्च २०१८ आणि ३१ मार्च २०१७ रोजी एनपीएमध्ये (नॉन प्रॉडक्टीव्ह असेट्स (अनुत्पादक जिंदगी)) गेली आहेत. त्या खात्यांवरील थकित कर्जाच्या रकमेपैकी अनुक्रमे १५ टक्के, ३० टक्के आणि ४५ टक्के रक्कम ही बँकांना सोसावी लागणार आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण केले व त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली परंतू ती प्रत्यक्षात झालेल्या कर्जमाफीच्या तुलनेत कमी असली तरी त्याबाबत शेतकºयांनी घाबरून जावू नये.ती रक्कम बँका सोसणार असल्याचे असे बँकिंग क्षेत्रातील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. यासंदर्भात राज्य शासन आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीमध्ये एक करारही झालेला आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ६६६ शेतकºयांची कर्जखाती अपलोड झालेली असून यापैकी एक लाख ४६ हजार ८०० शेतकºयांच्या कर्जखात्याचे विशिष्ट क्रमांक उपलब्ध झालेले ओत. दरम्यान, यापैकी एक लाख दोन हजार ९४० खात्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले आहे तर ४३ हजार ८५९ शेतकरी कर्ज खात्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे.दुसरीकडे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या १६ हजार १६० शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले असून पैकी १५ हजार ६५ शेतकºयांच्या कर्जमाफीचे ९५ कोटी ६६ लाख रुपये जिल्हा बँकेकडे वर्ग झाले आहेत.

काय आहे ‘हेअर कट’!राज्य शासन शेतकºयांच्या कर्जापोटी बँकांना पैसे देणार आहे. त्यामुळे बँकांचा एनपीए कमी होऊन बँकांची आर्थिक सक्षमता वाढले. परिणामी ज्या शेतकºयांची खाती ही ३० सप्टेंबर २०१९ ला एनपीएत गेली त्या शेतकºयाच्या कर्जापैकी १५ टक्के रक्कम बँकेला सोसावी लागणार आहे. ३१ मार्च २०१८ रोजी खाते एनपीए झालेले अल्यास बँकेला ३० टक्के तर ३१ मार्च २०१७ ला खाते एनपीए झाले असल्यास ४५ टक्के रक्कम ही बँकेला सोसावी लागणार आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि राज्य शासनास यांच्यात करार झालेला आहे. वाणगी दाखल सांगायचे झाल्यास जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा संचित तोटा शेतकरी कर्जमाफी माफीची रक्कम बँकेस मिळाल्यामुळे १०० कोटींनी कमी होणार आहे. वसूल न होणारी रक्कम बँकांना मिळत असल्याने बँकांनीही या ‘हेअर कट’ला मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीच्या रकमेपेक्षा कमी रक्कम जमा झाली असल्यास त्यांनी घाबरून जावू नये, ही तफावतीची रक्कम बँकांकडूनच भरण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीbankबँक