शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील युवकाच्या हत्येप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल

By निलेश जोशी | Updated: July 12, 2024 22:58 IST

पैशाचा पाऊस प्रकरणात तीन कारही केल्या जप्त

नीलेश जोशी, बुलढाणा-जानेफळ: पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या येथील दिलीप भिकाजी इंगळे या युवकाचा आर्थिक व्यवहारातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यामुळे १२ जुलै रोजी या प्रकरणात पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढवले आहे. सोबतच ५ ही आरोपींना मेहकर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

जानेफळ येथील इंदिरानगरमध्ये रहाणाऱ्या ज्योती दिलीप इंगळे यांनी २२ जून रोजी पोलिसात तक्रार दिली होती. पैशाचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने तिचे पती दिलीप इंगळे यांना अमोल जयसिंग राजपूत व नेले असून नगर जिल्ह्यातील कोकमठाण तालुक्यात कट रचून पूर्व नियोजन करून जीवे मारण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यावरून ९ जुलै रोजी गुन्ा दाखल झाला होता. प्रकरणात पोलिसांनी संदीप उर्फ बाबुराव सुभाष शेवाळे व योगेश रमेश तोंडे तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील आणखी तिघेजण असे एकूण ५ आरोपींना दि.११ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अटकेतील आरोपींनी दिलीप भिकाजी इंगळे याची हत्या केल्याचे कबूल असल्याचे पोलिसांनी सांगितले. १२ जुलै रोजी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतकाच्या कपड्यावर पटली अेाळख

कर्जत नजीक पोलिसांना मिळालेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हा दिलीप भिकाजी इंगळे याचाच होता का? याबद्दल साशंकता होती त्यामुळे मृतक दिलीप इंगले यांचे नातेवाईक १२ जुलै रोजी कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. मृतदेहाच्या अंगावरील पोलिसांनी जप्त केलेल्या कपड्यावरून तसेच शरीरावर असलेल्या टॅटूचा फोटो नातेवाईकांना दाखविण्यात आल्यानंतर मृतदेह दिलीप भिकाजी इंगळे यांचा असल्याची खात्री पटली. या प्रकरणात गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीन कारही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आरोपींच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी