शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

२१ गाव पाणीपुरवठा योजना विस्कळीत

By admin | Updated: June 27, 2014 00:28 IST

लाखनवाडा परिसरातील गावांना करारानुसार पाणीवाटप नाही

लाखनवाडा : लाखनवाडा परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्याकरीता मन प्रकल्पावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी या योजनेव्दारे होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिसरातील २१ गावांसाठी असलेल्या या पाणीपुरवठा योजनेवरुन पाणी वाटप व देखभाल दुरूस्तीचा कंत्राट देण्यात आलेला आहे. परंतु सदर कंत्राटदार यांचे पाणी सोडण्यावर नियंत्रण नाही त्यामुळे नागरीक पाणी पुरवठय़ामुळे त्रस्त आहेत. अनेकवेळा मोटारपंप नादूरूस्त किंवा जलवाहिनीमुळे बंद पडते. अशावेळेस धिम्मगतीने दुरूस्तीचे काम सुरू असते. परिणामी नागरीकांना चार/पाच दिवस पाणी मिळत नाही. वास्तविक पाणी समस्या महत्वाची बाब असल्यामुळे याला प्र थम प्राधान्य देवून युध्द पातळीवर दुरूस्तीचे काम करून शक्य तितक्या लवकर पाणी पुरवठा पुर्ववत सुरू करायला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. एवढय़ा वेळेस जलवाहिनी फुटली तर फक्त कपलींग नाही हे कारण देवून आणि ते अकोल्याशिवाय मिळत नाही, असे सांगुन पाणी पुरवठा बंद ठेवून नागरीकांना वेठीस धरण्यात येते. तसेच लाखनवाडा या गावाला दररोज चार लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येईल, असा करार झालेला आहे. परंतु या गावाला प्रत्यक्ष ितसर्‍या दिवशी जास्तीत जास्त एक ते तीन लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो म्हणजेच या गावाला दररोज १ लाख २५ हजार ते १ लाख ५0 हजार लिटर पाणी मिळते. आणि हे पाणी करारनाम्याप्रमाणे दररोज २ लाख ५0 हजार लिटर कमी मिळत आहे. गावाची लोकसंख्या विचारात घेता दररोज १ लाख ५0 हजार लिटर पाणी खुप कमी पडते, त्यामुळे नाईलाजास्तव ग्रामपंचायतला स्वताचे दोन मोटारपंप नियमीत चालु ठेवावे लागतात. तरी सुध्दा येथील नागरीकांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरीक पाण्यावाचून त्रस्त आहेत.तेव्हा कंत्राटदाराला समज देवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची आवश्यकता आहे.