शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही महिला शेतकरी न्यायापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST

लाखनी : तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवुन द्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही महिला शेतकऱ्याला न्यायासाठी ...

लाखनी : तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवुन द्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही महिला शेतकऱ्याला न्यायासाठी वणवण करावी लागत आहे.

लाखनी तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकरी कांताबाई भगवान बोडनकर यांची शेती आहे. एक वर्षापासशून त्यांच्या शेताशेजारी असलेल्या शेतकऱ्याने शेतातून रस्ता बनविल्याने हा रस्ता बंद करण्यासाठी कांताबाई यांनी राजस्व विभागाकडे विनंती केली होती. कांताबाई बोडनकर यांच्या शेतालगत असलेल्या शेतमालक अशोक बोडनकर यांना शेतात जाण्यासाठी दोन पिढ्यांपासून स्वतंत्र रस्ता सुरु आहे. मात्र तरी देखील जबरदस्तीने कांताबाई बोडनकर यांच्या शेतातुन तिसरा रस्ता बनविला आहे. त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. सांगुनही न ऐकल्यामुळे कांताबाई यांनी तालुका प्रशासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी गावचे संबधित तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांना या प्रकरणाचे गांभीर्य पाहून योग्य ती कारवाई संदर्भात सांगितले होते. या सोबतच कांताबाई बोडनकर यांनी गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच प्रतिष्ठीत नागरिकांना आपल्या शेतातील पाडलेला रस्ता दाखविला.

यावेळी सर्वांनी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली. मात्र प्रत्यक्ष कारवाई करताना तालुका प्रशासनाकडे खोटी माहिती तहसीलदारानना दिल्यामुळेच मला न्यायापासून वंचित राहावे लागले असल्याचा आरोप महिला शेतकऱ्यांनी केला आहे. त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत तहसीलदारांना याबाबत पत्र पाठविले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही याप्रकरणी कोणताही तोडगा न निघाल्याने कांताबाई बोडनकर यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची विणवणी केली. यावेळी कांताबाई बोडनकर यांनी तालुका प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा व गावातील सरपंचांसह अन्य पदाधिकाऱ्यांना सांगूनही न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे महिला शेतकऱ्यांची होणारी वणवण लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ साकोलीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठविले.

या पत्रामध्ये प्रकरणाची वास्तविक स्थिती तपासून नियमानुसार योग्य ती कारवाई करुन तक्रारकर्ते कांताबाईंना लिखीत स्वरुपात सूचना देण्यास सांगितले होते. मात्र आजपावेतो तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला देखील खो दिला असून पाहणी केली नाही. त्यामुळे महिला शेतकऱ्याला दरवर्षीच होणाऱ्या नुकसानीतून आता कोण सोडविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महसुल विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने महिला शेतकरी संतप्त झाले असुन आता पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली जाणार आहे.