शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही महिला शेतकरी न्यायापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST

लाखनी : तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवुन द्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही महिला शेतकऱ्याला न्यायासाठी ...

लाखनी : तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवुन द्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही महिला शेतकऱ्याला न्यायासाठी वणवण करावी लागत आहे.

लाखनी तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकरी कांताबाई भगवान बोडनकर यांची शेती आहे. एक वर्षापासशून त्यांच्या शेताशेजारी असलेल्या शेतकऱ्याने शेतातून रस्ता बनविल्याने हा रस्ता बंद करण्यासाठी कांताबाई यांनी राजस्व विभागाकडे विनंती केली होती. कांताबाई बोडनकर यांच्या शेतालगत असलेल्या शेतमालक अशोक बोडनकर यांना शेतात जाण्यासाठी दोन पिढ्यांपासून स्वतंत्र रस्ता सुरु आहे. मात्र तरी देखील जबरदस्तीने कांताबाई बोडनकर यांच्या शेतातुन तिसरा रस्ता बनविला आहे. त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. सांगुनही न ऐकल्यामुळे कांताबाई यांनी तालुका प्रशासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी गावचे संबधित तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांना या प्रकरणाचे गांभीर्य पाहून योग्य ती कारवाई संदर्भात सांगितले होते. या सोबतच कांताबाई बोडनकर यांनी गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच प्रतिष्ठीत नागरिकांना आपल्या शेतातील पाडलेला रस्ता दाखविला.

यावेळी सर्वांनी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली. मात्र प्रत्यक्ष कारवाई करताना तालुका प्रशासनाकडे खोटी माहिती तहसीलदारानना दिल्यामुळेच मला न्यायापासून वंचित राहावे लागले असल्याचा आरोप महिला शेतकऱ्यांनी केला आहे. त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत तहसीलदारांना याबाबत पत्र पाठविले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही याप्रकरणी कोणताही तोडगा न निघाल्याने कांताबाई बोडनकर यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची विणवणी केली. यावेळी कांताबाई बोडनकर यांनी तालुका प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा व गावातील सरपंचांसह अन्य पदाधिकाऱ्यांना सांगूनही न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे महिला शेतकऱ्यांची होणारी वणवण लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ साकोलीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठविले.

या पत्रामध्ये प्रकरणाची वास्तविक स्थिती तपासून नियमानुसार योग्य ती कारवाई करुन तक्रारकर्ते कांताबाईंना लिखीत स्वरुपात सूचना देण्यास सांगितले होते. मात्र आजपावेतो तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला देखील खो दिला असून पाहणी केली नाही. त्यामुळे महिला शेतकऱ्याला दरवर्षीच होणाऱ्या नुकसानीतून आता कोण सोडविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महसुल विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने महिला शेतकरी संतप्त झाले असुन आता पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली जाणार आहे.