शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही महिला शेतकरी न्यायापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST

लाखनी : तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवुन द्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही महिला शेतकऱ्याला न्यायासाठी ...

लाखनी : तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवुन द्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही महिला शेतकऱ्याला न्यायासाठी वणवण करावी लागत आहे.

लाखनी तालुक्यातील पोहरा येथील महिला शेतकरी कांताबाई भगवान बोडनकर यांची शेती आहे. एक वर्षापासशून त्यांच्या शेताशेजारी असलेल्या शेतकऱ्याने शेतातून रस्ता बनविल्याने हा रस्ता बंद करण्यासाठी कांताबाई यांनी राजस्व विभागाकडे विनंती केली होती. कांताबाई बोडनकर यांच्या शेतालगत असलेल्या शेतमालक अशोक बोडनकर यांना शेतात जाण्यासाठी दोन पिढ्यांपासून स्वतंत्र रस्ता सुरु आहे. मात्र तरी देखील जबरदस्तीने कांताबाई बोडनकर यांच्या शेतातुन तिसरा रस्ता बनविला आहे. त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. सांगुनही न ऐकल्यामुळे कांताबाई यांनी तालुका प्रशासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी गावचे संबधित तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांना या प्रकरणाचे गांभीर्य पाहून योग्य ती कारवाई संदर्भात सांगितले होते. या सोबतच कांताबाई बोडनकर यांनी गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच प्रतिष्ठीत नागरिकांना आपल्या शेतातील पाडलेला रस्ता दाखविला.

यावेळी सर्वांनी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली. मात्र प्रत्यक्ष कारवाई करताना तालुका प्रशासनाकडे खोटी माहिती तहसीलदारानना दिल्यामुळेच मला न्यायापासून वंचित राहावे लागले असल्याचा आरोप महिला शेतकऱ्यांनी केला आहे. त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत तहसीलदारांना याबाबत पत्र पाठविले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही याप्रकरणी कोणताही तोडगा न निघाल्याने कांताबाई बोडनकर यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची विणवणी केली. यावेळी कांताबाई बोडनकर यांनी तालुका प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा व गावातील सरपंचांसह अन्य पदाधिकाऱ्यांना सांगूनही न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे महिला शेतकऱ्यांची होणारी वणवण लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ साकोलीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठविले.

या पत्रामध्ये प्रकरणाची वास्तविक स्थिती तपासून नियमानुसार योग्य ती कारवाई करुन तक्रारकर्ते कांताबाईंना लिखीत स्वरुपात सूचना देण्यास सांगितले होते. मात्र आजपावेतो तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला देखील खो दिला असून पाहणी केली नाही. त्यामुळे महिला शेतकऱ्याला दरवर्षीच होणाऱ्या नुकसानीतून आता कोण सोडविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महसुल विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने महिला शेतकरी संतप्त झाले असुन आता पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली जाणार आहे.