शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी बचावासाठी योजना ढीगभर, प्रत्यक्ष अंमलबजावणी बोटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST

तुमसर: जंगलाशेजारी शेतशिवारात विहिरींना कठडे बांधण्यासाठी वन विभागाची श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेसह केंद्र शासनाच्या ढीगभर योजना अस्तित्त्वात आहेत. ...

तुमसर: जंगलाशेजारी शेतशिवारात विहिरींना कठडे बांधण्यासाठी वन विभागाची श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेसह केंद्र शासनाच्या ढीगभर योजना अस्तित्त्वात आहेत. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने जंगलातील बिबट्या, वाघ व इतर वन्य प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडत आहेत.एका आठवड्यापूर्वी भंडारा जिल्ह्यात अशी घटना घडली. यावर मात करण्याकरिता तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन विभागाने वन्यप्राणी बचावासाठी यापूर्वीच पुढाकार घेतला असून, या वन परिक्षेत्रात वन्यप्राणी मृत्युमुखी पडले नाहीत.

गत आठवड्यात भंडारा जिल्ह्यात वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू पाण्याच्या टाक्यात पडून झाला होता. त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आल्याची चर्चा संपूर्ण राज्यात चर्चेला आली. सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी जंगलातील व जंगलांलगतच्या शेतातील विहिरींची माहिती प्रत्येक वन परिक्षेत्रातून पाठविण्याचे निर्देश वन विभागाने दिले होते. सदर विहिरींना कठडे बांधण्याची कामे तत्काळ करावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश वन विभागाने केले होते. यानंतरही जंगलव्याप्त परिसरात विहिरीत पडून वन्यप्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. या घटनांमुळे वन विभागाचे दुर्लक्ष येथे दिसत आहे. अद्यापपर्यंत वन विभागाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही, असे दिसून येते. वन विभागाने संबंधित वन परिक्षेत्राला आदेश दिल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात वन्य प्राणी जंगलात पाण्यासाठी वणवण भटकतात. रानटी कुत्रे पाठलाग करताना अनेक तृणभक्षी प्राण्यांचा जीव गेला आहे. वाघ, बिबट्यासह अन्य प्राण्यांचा सातत्याने कठडाविना विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

बॉक्स

नाकाडोंगरी वन परिक्षेत्र चर्चेत

राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी जंगल शिवारातील विहिरींना कठडे बांधण्याचा नवीन पायंडा घातला. सदर जंगल घनदाट व राखीव आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. केंद्र शासनाची योजना व शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत केवळ दहा लाख रुपयात वन परिक्षेत्रातील ३९ विहिरींवर आतापर्यंत कठडे उभारले आहेत. यामुळे या वन परिक्षेत्रात वन्यप्राणी विहिरीत पडण्याचे प्रमाण शून्य आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात लावल्यास वन्य प्राण्यांचा जीव वाचविण्यास मोठी मदत होईल.

कोट

केंद्र पुरस्कृत योजना व शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत नाकाडोंगरी वन परिक्षेत्रात जंगलात लागून असणाऱ्या शेतातील विहिरी व जिथे अशा घटना होण्याची शक्यता आहे त्या गावातील विहिरींची निवड केली. या विहिरींवर शेतकऱ्यांना कठडे बांधून घेण्याकरिता अर्ज करण्यास सांगण्यात आले. सन २०१९ - २० या काळात विहिरीवर कठडे बांधून झाले. त्यानंतर नाका डोंगरी वन परिक्षेत्रात वन्यप्राणी विहिरीत पडण्याची एकही घटना घडली नाही.

नितेश धनविजय

वन परिक्षेत्र अधिकारी, नाका डोंगरी.