शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानाचे चुकारे केव्हा मिळणार?

By admin | Updated: July 4, 2016 00:24 IST

उन्हाळी धानपिकाची खरेदी केल्यानंतर चार दिवसात चुकारे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

विलास श्रुंगारपवार : व्याजाचा नाहक भुर्दंड बसणारभंडारा : उन्हाळी धानपिकाची खरेदी केल्यानंतर चार दिवसात चुकारे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. हे सरकार केवळ पोकळ आश्वासन देणारे सरकार असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विलासराव श्रुंगारपवार यांनी केला आहे.मागीलवर्षी खरीपाच्या हंगामातील धानपीक शेतकऱ्यांच्या हातात आले. त्यावेळी आधारभूत धान खरेदी केंद्र विलंबाने सुरू करण्यात आले. त्यामुळे कर्जात असलेल्या शेतकऱ्यांना धानपीक कमी दरात व्यापाऱ्यांना विकावे लागले. आधारभूत केंद्र सुरू झाले तोपर्यंत शेतकऱ्यांचे धानपीक विकून झाले होते. त्यामुळे त्यांना बोनस मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी नागविला गेला. या कठिण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. पीक आल्यानंतर ते विकण्यासाठी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. खरेदीच्या चार दिवसातच चुकारे देऊ, असे सरकारने सांगितले होते. परंतु अद्याप चुकारे देण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन धान लागवड केली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत ३० जूनपर्यंत पीक कर्जाचे पैसे भरावे लागतात तर जिल्हा बँकेत ३१ मार्च ही कर्ज भरण्याची शेवटची तारीख असते. शेतकऱ्यांना वेळेत चुकारे न दिल्यामुळे ते पैसे कसे भरतील? त्यांच्यावर व्याजाचा नाहक भुर्दंड पडेल त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही श्रुंगारपवार यांनी उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)