शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘है क्या.. भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ आवाज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:05 IST

‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला.

ठळक मुद्देअपघाताचा परिणाम : अवैध प्रवासी वाहने क्षणार्धात बेपत्ता, पोलिसांकडून मात्र कुठलीही कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला. अवैध प्रवासी वाहतुकीने सहा जणांचे बळी घेतल्यानंतर बुधवारी चौकात एकही वाहन दिसत नव्हते.साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीत काळीपिवळी जीप पडून सहा जणांचा बळी गेला. अवैध प्रवासी वाहतुकीचे हे बळी ठरले. गत काही वर्षांपासून साकोलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. शहराच्या मध्य वस्तीत आणि बसस्थानकालगत या वाहनधारकांचा डेरा असतो. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सकाळपासूनच जोरजोराने आवाज दिला जातो. प्रवाशांना खचाखच भरून प्रवास केला जातो. वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडवत अपघाताला आमंत्रण दिले जाते. साकोली हे तर अवैध वाहतुकीचे मुख्य केंद्र झाले आहे. येथे विविध कामानिमित्त शेकडो नागरिक दररोज येतात. पुरेशा एसटी बस अभावी नागरिक या अवैध प्रवासी वाहनांना पसंती देतात. आॅटो रिक्षा, काळीपिवळी यासह इतर वाहनातून प्रवास केला जातो. पोलिसांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार सुरु असतो. परंतु कुणीही त्याला अटकाव करीत नाही.साकोली बसस्थानक परिसर, एकोडी रोड, लाखांदूर रोड, जुने बसस्थानक या ठिकाणी काळीपिवळी वाहने दिवसभर उभी असतात. प्रवाशांना कोंबून बसविली जाते. अपघातानंतर बुधवारी साकोलीत एकही अवैध प्रवासी वाहन दिसले नाही. ज्या ठिकाणी दिवसभर गोंगाट असतो त्या परिसरात बुधवारी शुकशुकाट दिसत होता. ना कोणता गोंधळना, ना कुणाचा आवाज.पोलिसांची मेहरनजरसाकोलीसह जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक बिनबोभाट सुरु आहे. ही वाहतूक केवळ हप्तेखोरीच्या बळावर सुरु आहे. वाहनचालक खुलेआम कुणाला किती हप्ता द्यावा लागतो हे प्रवासादरम्यान सांगतात. सामान्य माणसाला त्याचे काही देणेघेणेही नसते. परंतु कुंभलीसारखी घटना घडते तेव्हा प्रश्न ऐरणीवर येतो. पोलिसांचे असलेले साटेलोटे आणखी किती निष्पाप जीवांचा बळी घेणार हा प्रश्न आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच या वाहतुकीला हद्दपार करण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातTaxiटॅक्सी