शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

‘है क्या.. भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ आवाज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:05 IST

‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला.

ठळक मुद्देअपघाताचा परिणाम : अवैध प्रवासी वाहने क्षणार्धात बेपत्ता, पोलिसांकडून मात्र कुठलीही कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला. अवैध प्रवासी वाहतुकीने सहा जणांचे बळी घेतल्यानंतर बुधवारी चौकात एकही वाहन दिसत नव्हते.साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीत काळीपिवळी जीप पडून सहा जणांचा बळी गेला. अवैध प्रवासी वाहतुकीचे हे बळी ठरले. गत काही वर्षांपासून साकोलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. शहराच्या मध्य वस्तीत आणि बसस्थानकालगत या वाहनधारकांचा डेरा असतो. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सकाळपासूनच जोरजोराने आवाज दिला जातो. प्रवाशांना खचाखच भरून प्रवास केला जातो. वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडवत अपघाताला आमंत्रण दिले जाते. साकोली हे तर अवैध वाहतुकीचे मुख्य केंद्र झाले आहे. येथे विविध कामानिमित्त शेकडो नागरिक दररोज येतात. पुरेशा एसटी बस अभावी नागरिक या अवैध प्रवासी वाहनांना पसंती देतात. आॅटो रिक्षा, काळीपिवळी यासह इतर वाहनातून प्रवास केला जातो. पोलिसांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार सुरु असतो. परंतु कुणीही त्याला अटकाव करीत नाही.साकोली बसस्थानक परिसर, एकोडी रोड, लाखांदूर रोड, जुने बसस्थानक या ठिकाणी काळीपिवळी वाहने दिवसभर उभी असतात. प्रवाशांना कोंबून बसविली जाते. अपघातानंतर बुधवारी साकोलीत एकही अवैध प्रवासी वाहन दिसले नाही. ज्या ठिकाणी दिवसभर गोंगाट असतो त्या परिसरात बुधवारी शुकशुकाट दिसत होता. ना कोणता गोंधळना, ना कुणाचा आवाज.पोलिसांची मेहरनजरसाकोलीसह जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक बिनबोभाट सुरु आहे. ही वाहतूक केवळ हप्तेखोरीच्या बळावर सुरु आहे. वाहनचालक खुलेआम कुणाला किती हप्ता द्यावा लागतो हे प्रवासादरम्यान सांगतात. सामान्य माणसाला त्याचे काही देणेघेणेही नसते. परंतु कुंभलीसारखी घटना घडते तेव्हा प्रश्न ऐरणीवर येतो. पोलिसांचे असलेले साटेलोटे आणखी किती निष्पाप जीवांचा बळी घेणार हा प्रश्न आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच या वाहतुकीला हद्दपार करण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातTaxiटॅक्सी