शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘है क्या.. भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ आवाज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:05 IST

‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला.

ठळक मुद्देअपघाताचा परिणाम : अवैध प्रवासी वाहने क्षणार्धात बेपत्ता, पोलिसांकडून मात्र कुठलीही कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला. अवैध प्रवासी वाहतुकीने सहा जणांचे बळी घेतल्यानंतर बुधवारी चौकात एकही वाहन दिसत नव्हते.साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीत काळीपिवळी जीप पडून सहा जणांचा बळी गेला. अवैध प्रवासी वाहतुकीचे हे बळी ठरले. गत काही वर्षांपासून साकोलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. शहराच्या मध्य वस्तीत आणि बसस्थानकालगत या वाहनधारकांचा डेरा असतो. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सकाळपासूनच जोरजोराने आवाज दिला जातो. प्रवाशांना खचाखच भरून प्रवास केला जातो. वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडवत अपघाताला आमंत्रण दिले जाते. साकोली हे तर अवैध वाहतुकीचे मुख्य केंद्र झाले आहे. येथे विविध कामानिमित्त शेकडो नागरिक दररोज येतात. पुरेशा एसटी बस अभावी नागरिक या अवैध प्रवासी वाहनांना पसंती देतात. आॅटो रिक्षा, काळीपिवळी यासह इतर वाहनातून प्रवास केला जातो. पोलिसांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार सुरु असतो. परंतु कुणीही त्याला अटकाव करीत नाही.साकोली बसस्थानक परिसर, एकोडी रोड, लाखांदूर रोड, जुने बसस्थानक या ठिकाणी काळीपिवळी वाहने दिवसभर उभी असतात. प्रवाशांना कोंबून बसविली जाते. अपघातानंतर बुधवारी साकोलीत एकही अवैध प्रवासी वाहन दिसले नाही. ज्या ठिकाणी दिवसभर गोंगाट असतो त्या परिसरात बुधवारी शुकशुकाट दिसत होता. ना कोणता गोंधळना, ना कुणाचा आवाज.पोलिसांची मेहरनजरसाकोलीसह जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक बिनबोभाट सुरु आहे. ही वाहतूक केवळ हप्तेखोरीच्या बळावर सुरु आहे. वाहनचालक खुलेआम कुणाला किती हप्ता द्यावा लागतो हे प्रवासादरम्यान सांगतात. सामान्य माणसाला त्याचे काही देणेघेणेही नसते. परंतु कुंभलीसारखी घटना घडते तेव्हा प्रश्न ऐरणीवर येतो. पोलिसांचे असलेले साटेलोटे आणखी किती निष्पाप जीवांचा बळी घेणार हा प्रश्न आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच या वाहतुकीला हद्दपार करण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातTaxiटॅक्सी