शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजना बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

महावितरणतर्फे राबविण्यात आलेली कृषी संजिवनी योजनेची मुदतवाढ संपल्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग होण्यापूर्वीच ही योजना बंद करण्यात आली आहे.

चुल्हाड (सिहोरा) : महावितरणतर्फे राबविण्यात आलेली कृषी संजिवनी योजनेची मुदतवाढ संपल्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग होण्यापूर्वीच ही योजना बंद करण्यात आली आहे. यामुळे तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांची धाकधुकी वाढलेली आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे वीज वितरण कंपनीचे कोट्यवधी रूपयांचे विज बिल थकीत आहेत. सततच्या नापिकीमुळे शेतकरी विज बिलाची देयक देत नाहीत. याशिवाय १४ तासाचे भारनियमन असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी वीज वितरण कंपनीविरुद्ध संतप्त भावना व्यक्त होत आहे. शेतकऱ्याकडची वाढती थकबाकी वीज वितरण कंपनीसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. विजेच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी राज्यात कृषी संजिवनी योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. वातानुकुलित खोलीत बसून या योनजेचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. नियोजनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि धानपिकांचा पंचनामा केलेला नाही. त्यामुळे या योजनेची मुदतवाढ संपली असतानाही शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना विज बिलात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना संजिवणी ठरणारी आहे. या योजनेची सुरूवात आॅगस्ट महिन्यात करण्यात आली असून शेतकऱ्यांना विज बिलाचे देयक तथा सहभागासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ आॅक्टोंबरला योजनेची अंतिम मुदतवाढ संपली असतानाही १ टक्के शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या योजनते शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद नोंदविला असून विज बिलाची देयके दिलेले नाही, या कारणावरून रब्बी हंगामात कृषी पंपांचा विज पुरवठा खंडीत केला जाणार आहे. उन्हाळी धान पिकाला पाण्याची गरज असते. हीच संधी साधून कृषी संजिवनी योजना बंद करण्यात आली आहे. सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पिक आहे. धानाचे पिक शेतकऱ्यांच्या हातात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. सध्या धान कापणी सुरू आहे. मळणीनंतर धानाची विक्री करण्यात येणार आहे. धान खरेदी केंद्रांवर चुकारे वाटपात विलंब होत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. धान पिकाची लागवड करताना कर्जाचे डोंगर आहे. बँका, सोसायटीच्या नजरा शेतकऱ्यांकडे लागलेल्या आहेत. धानाच्या उत्पादनाची चिंता कुणालाही नाही. केवळ वसुली मिळाली पाहिजे, अशा नोटीस येत असल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. जिल्ह्यात कृषी संजिवनी योजनेत सहभागी शेतकऱ्यांचा आकडा नाही. नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांना ही योजना न्याय देऊ शकली नाही. निकष तथा मुदतवाढ देण्याची क्षमता लोकप्रतिनिधीमध्ये आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आता शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद करण्याची गरज आहे. (वार्ताहर)