शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा

By admin | Published: February 12, 2017 12:22 AM

गाव हागणदारीमुक्त कसा होईल. याबाबत प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गाव स्वच्छ व सुंदर जर राहिला तर आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, ...

अनिता तेलंग : ग्रामपंचायतीने घेतला पुढाकारअड्याळ : गाव हागणदारीमुक्त कसा होईल. याबाबत प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गाव स्वच्छ व सुंदर जर राहिला तर आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी अनिता तेलंग यांनी व्यक्त केले. महिला व समाजकल्याण तसेच ग्रामस्वच्छता अभियान यासाठी ग्रामपंचायत अड्याळने पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन गुजरी चौक येथे केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी खंड विकास अधिकारी, ठाणेदार अजाबराव नेवारे, सरपंच रजनी धारणे, उपसरपंच देवीदास नगरे, ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी तेलंग यांनी, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सोबत ग्रामस्थांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. आपल्या आरोग्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय व्हावे यासाठी शासनाकडून मदतही मिळत आहे. कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचे असल्यास त्यासाठी घरात शौचालय असणे महत्वाचे. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाने ज्यांच्या घरी जनावरांची संख्या जास्त आहे अशांनी बायोगॅसचा वापर करावा, असे मार्गदर्शन तेलंग यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला होता. (वार्ताहर)