शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
6
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
7
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
8
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
9
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
10
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
11
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
12
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
13
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
14
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
15
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
16
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
17
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
18
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
19
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
20
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या महागल्या, पिशवी रिकामीच

By admin | Updated: July 16, 2014 23:55 IST

पावसाळा कोरडा जात असल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किंमतीत बेशुमार वाढ झाली. पावसाअभावी पिकावर संकट आल्यामुळे विक्रेत्यांना बाहेरील जिल्ह्यातून भाज्या खरेदी कराव्या लागत आहे.

भंडारा : पावसाळा कोरडा जात असल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किंमतीत बेशुमार वाढ झाली. पावसाअभावी पिकावर संकट आल्यामुळे विक्रेत्यांना बाहेरील जिल्ह्यातून भाज्या खरेदी कराव्या लागत आहे. सध्या टमाटर व हिरवी मिरची प्रती किलो ६० रूपये दरात विक्री जात असल्याने सर्वसामान्याच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.
यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पाऊस आला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. सिंचनाअभावी शेतातील भाजीपाला सुकत असल्याचे सांगितले जाते. इतर जिल्ह्यातून महागड्या भाजीपाला विक्रीला येत आहे.
सध्या भाजी बाजारातील वाढलेल्या किंमती ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या येत आहे. येथे टोमॅटो हिरव्या मिरची ६० रूपये प्रती किलो आहे. गव्हार व चवळीच्या शेंगांचा दर ४० रूपये प्रति किलो आहे. भाजीबाजारात ३५ ते ४० रूपये दरात वांगे-भेंडी विकली जात आहे. तसेच आलू, कांदे, लसून, आले, भोपळा अशा सर्वच भाज्यांचे भाव वधारलेले आहेत. बाजारात वाढलेले भाव पहाता गृहिनींना पर्यायी उपायांकडे लक्ष वळवावे लागत आहे.
सर्वसाधारण नागरिकांना रोज महागडी भाजी खरेदी करणे परवडणारे नाही. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या महिन्यांचा हिशोब बिघडत आहे. भाजीपाला विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही. थोडीफार बचत करून अन्य खर्च भागविण्याकडे गृहिणीचा कल दिसतो. सध्या भाजी बाजारातील भाव वाढ सर्वांसाठी त्रासदायक ठरणारी आहे. (प्रतिनिधी)