शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अवकाळी पावसाचा फटका, भाजीपाल्याचे दर निम्म्याने कोसळले

By युवराज गोमास | Updated: December 2, 2023 16:37 IST

शेतकरी संकटात फुलकोबी ३० रुपये तर मेथी, पालक दहाला एक.

युवराज गोमासे,भंडारा : महिन्याभरापूर्वी तसेच दिवाळीत भाजीपाल्याचे दर वधारले होते. परंतु, दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने आता भाव चांगलेच गडगडले आहेत. ६० ते ८० रुपये किलोने विकली जाणारी फुलकोबी निम्म्याने घसरली ३० रूपये किलो दराने विकली जात आहे. शेतकऱ्यांकडून २० रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. किलोने विकली जाणारी मेथी व पालक आता दहा रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपाला उत्पादकांना चांगलाच बसला आहे. आवक वाढल्याने दर घसरले आहेत.

दिवाळीत भाजीपाल्याचे दर वाढल्याची ओरड करणारे आता शेतकऱ्यांची व्यथा समजून घेताना दिसत नाहीत. उलट भाजीपाला स्वस्त असतानाही आणखी तोलमोल केला जात आहे. मात्र, उत्पादन खर्च वाढलेला असताना निम्म्या दरात भाजीपाला विकणे आम्हाला कसे परवडेल, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

यंदा सणासुदीच्या काळातही भाजीपाला दरात थोडीशी वाढ झाली होती. त्यातही भाजीपाल्याचे उत्पादन जेमतेम होत असल्याने शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदा झाला नाही. आता भाजीपाल्याचे उत्पादन बऱ्यापैकी वाढले असताना बाजारात शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने घेतला जात आहे. टोमॅटोसह सर्वच भाज्यांची अल्पदरात शेतकऱ्यांकडून खरेदी केली जात आहे.

तुरीच्या शेंगा बाजारात उपलब्ध-

बाजारात आता तुरीच्या शेंगा दाखल होऊ लागल्या आहेत. ६० ते ८० रुपयांचा दर मिळतो आहे. या शेंगांच्या भाजीवर अनेकांचा जोर असतो. शेतात काम करणारे कामगार तर पुढील दोन महिने याच शेंगांच्या दाण्यांची भाजी खातात. करडई, हरभऱ्याच्या भाजीचाही वापर या दिवसांत वाढतो. त्यामुळे भाज्यांची मागणी घटत असल्याने दरावर परिणाम होत आहे.

सध्या ठोक बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. परंतु, दर वाढले की लोक ओरड करू लागतात. मात्र, दर घसरल्यास त्यांना शेतकऱ्यांचा विचार येत नाही. सध्या भाजीपाल्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांबरोबर किरकोळ व्यापाऱ्यांचा नफाही घटला आहे. त्रास व खर्च मात्र सारखाच आहे.- फुलचंद बांते, भाजीपाला विक्रेता.

भाजीपाला पिकांसाठी खर्चाचे बजेट वाढले आहे. त्यातच वन्यप्राणी व कीड तसेच रोगांपासून पिकांच्या रक्षणासाठी रात्र रात्र थंडीत जागावे लागते. परंतु, आता दर घसरल्याने ग्राहकांना आमचा त्रास दिसत नाही का? ग्राहकांना केवळ स्वस्त भाजीपाला हवाय का, इतर वस्तूंच्या बाबतीत विचार का होत नाही?.- रामभाऊ नेरकर, शेतकरी.

व्यापारी खातात मलाई-

शेतकऱ्यांकडून अल्पदराने भाजीपाला खरेदी होत असला तरी ग्राहकांना मात्र त्याचा फायदा होत नाही. शेतकऱ्यांकडून २० रुपये किलो दराने खरेदी केली जाणारी फुलकोबी ग्राहकांना मात्र ४० ते ६० रुपये किलो दराने विकली जाते. ४० रुपये किलोने खरेदी होणारा शेवगा ८० रुपये किलो दराने, १० रुपये दराने खरेदी होणारी पालक भाजी ४० रुपये किलो दराने ग्राहकांना विकली जाते. व्यापारी मलाई खाताना दिसून येतात.

किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर -

भाजीपाला दर     रुपये

फुलकोबी            ३०मिरची                  ४०

टोमॅटो                 २०वांगे                     ३०

पत्ता कोबी           २०भेंडी                    ३०

पालक             १० रुपये जुडीसांभार             १० रुपये जुडी

मेथी                 १० रुपये जुडीलाल भाजी       १० रुपये जुडी

टॅग्स :bhandara-acभंडाराvegetableभाज्या