शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा फटका, भाजीपाल्याचे दर निम्म्याने कोसळले

By युवराज गोमास | Updated: December 2, 2023 16:37 IST

शेतकरी संकटात फुलकोबी ३० रुपये तर मेथी, पालक दहाला एक.

युवराज गोमासे,भंडारा : महिन्याभरापूर्वी तसेच दिवाळीत भाजीपाल्याचे दर वधारले होते. परंतु, दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने आता भाव चांगलेच गडगडले आहेत. ६० ते ८० रुपये किलोने विकली जाणारी फुलकोबी निम्म्याने घसरली ३० रूपये किलो दराने विकली जात आहे. शेतकऱ्यांकडून २० रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. किलोने विकली जाणारी मेथी व पालक आता दहा रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपाला उत्पादकांना चांगलाच बसला आहे. आवक वाढल्याने दर घसरले आहेत.

दिवाळीत भाजीपाल्याचे दर वाढल्याची ओरड करणारे आता शेतकऱ्यांची व्यथा समजून घेताना दिसत नाहीत. उलट भाजीपाला स्वस्त असतानाही आणखी तोलमोल केला जात आहे. मात्र, उत्पादन खर्च वाढलेला असताना निम्म्या दरात भाजीपाला विकणे आम्हाला कसे परवडेल, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

यंदा सणासुदीच्या काळातही भाजीपाला दरात थोडीशी वाढ झाली होती. त्यातही भाजीपाल्याचे उत्पादन जेमतेम होत असल्याने शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदा झाला नाही. आता भाजीपाल्याचे उत्पादन बऱ्यापैकी वाढले असताना बाजारात शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने घेतला जात आहे. टोमॅटोसह सर्वच भाज्यांची अल्पदरात शेतकऱ्यांकडून खरेदी केली जात आहे.

तुरीच्या शेंगा बाजारात उपलब्ध-

बाजारात आता तुरीच्या शेंगा दाखल होऊ लागल्या आहेत. ६० ते ८० रुपयांचा दर मिळतो आहे. या शेंगांच्या भाजीवर अनेकांचा जोर असतो. शेतात काम करणारे कामगार तर पुढील दोन महिने याच शेंगांच्या दाण्यांची भाजी खातात. करडई, हरभऱ्याच्या भाजीचाही वापर या दिवसांत वाढतो. त्यामुळे भाज्यांची मागणी घटत असल्याने दरावर परिणाम होत आहे.

सध्या ठोक बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. परंतु, दर वाढले की लोक ओरड करू लागतात. मात्र, दर घसरल्यास त्यांना शेतकऱ्यांचा विचार येत नाही. सध्या भाजीपाल्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांबरोबर किरकोळ व्यापाऱ्यांचा नफाही घटला आहे. त्रास व खर्च मात्र सारखाच आहे.- फुलचंद बांते, भाजीपाला विक्रेता.

भाजीपाला पिकांसाठी खर्चाचे बजेट वाढले आहे. त्यातच वन्यप्राणी व कीड तसेच रोगांपासून पिकांच्या रक्षणासाठी रात्र रात्र थंडीत जागावे लागते. परंतु, आता दर घसरल्याने ग्राहकांना आमचा त्रास दिसत नाही का? ग्राहकांना केवळ स्वस्त भाजीपाला हवाय का, इतर वस्तूंच्या बाबतीत विचार का होत नाही?.- रामभाऊ नेरकर, शेतकरी.

व्यापारी खातात मलाई-

शेतकऱ्यांकडून अल्पदराने भाजीपाला खरेदी होत असला तरी ग्राहकांना मात्र त्याचा फायदा होत नाही. शेतकऱ्यांकडून २० रुपये किलो दराने खरेदी केली जाणारी फुलकोबी ग्राहकांना मात्र ४० ते ६० रुपये किलो दराने विकली जाते. ४० रुपये किलोने खरेदी होणारा शेवगा ८० रुपये किलो दराने, १० रुपये दराने खरेदी होणारी पालक भाजी ४० रुपये किलो दराने ग्राहकांना विकली जाते. व्यापारी मलाई खाताना दिसून येतात.

किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर -

भाजीपाला दर     रुपये

फुलकोबी            ३०मिरची                  ४०

टोमॅटो                 २०वांगे                     ३०

पत्ता कोबी           २०भेंडी                    ३०

पालक             १० रुपये जुडीसांभार             १० रुपये जुडी

मेथी                 १० रुपये जुडीलाल भाजी       १० रुपये जुडी

टॅग्स :bhandara-acभंडाराvegetableभाज्या