शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

भंडाऱ्यावरून एसटीच्या चार बसेसच्या १२ फेऱ्या निघाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 5:00 AM

खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. कर्मचारी मात्र कोणत्याही परिस्थितीत कामावर येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत गत आठ दिवसांपासून महामंडळाने काही बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. सर्वप्रथम साकोली आगारातून आठ दिवसापासून भंडारापर्यंत दररोज दोन बसच्या आठ फेऱ्या सुरू आहे. दरम्यान बुधवारी भंडारा-पवनी आणि भंडारा-नागपूर अशा दोन बस काढण्यात आल्या. पवनी बस भंडारा स्थानकावरून १२.३० वाजता सुटली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल ४० दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गत आठ दिवसांपासून काही बसफेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी भंडारा बसस्थानकावरून चार बसेसच्या १२ फेऱ्या झाल्या. नागपूरला गेलेल्या बसमध्ये खचाखच प्रवासी भरून होते. संप मिटविण्यासाठी स्थानिक पातळीवरही अधिकारी प्रयत्न करीत आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. कर्मचारी मात्र कोणत्याही परिस्थितीत कामावर येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत गत आठ दिवसांपासून महामंडळाने काही बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. सर्वप्रथम साकोली आगारातून आठ दिवसापासून भंडारापर्यंत दररोज दोन बसच्या आठ फेऱ्या सुरू आहे. दरम्यान बुधवारी भंडारा-पवनी आणि भंडारा-नागपूर अशा दोन बस काढण्यात आल्या. पवनी बस भंडारा स्थानकावरून १२.३० वाजता सुटली. त्यात जाताना ३८ तर येताना ४५ प्रवासी होते. नागपूरसाठी दुपारी २.३० वाजता सुटलेल्या बसमध्ये तब्बल ५८ प्रवासी होते. दोन बसेसच्या १२ फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांसी संवादभंडारा ते पवनी या बसमध्ये विभागीय वाहतूक नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी बुधवारी स्वत: प्रवास केला. त्यावेळी त्यांनी प्रवाशांसी संवाद साधला. एसटी बसच्या दोन फेऱ्या का होईना सुरू झाल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. या बसमधून अनेक विद्यार्थ्यांनी प्रवास केला. बससेवा सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा यावेळी सर्वच प्रवासी व्यक्त करीत असल्याचे डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना आवाहन- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेळोवेळी आवाहन केले. याबाबत भंडारा विभागाचे विभागीय वाहतूक नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी गत दोन दिवसात आंदोलनात असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. आगारासमोर सुरू असलेल्या मंडपात भेट देवून त्यांनी परिवहन मंत्र्यांना निरोप दिला. प्रथम कामावर हजर व्हा, योग्य न्याय मिळेल असे सांगितले. परंतु अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप