शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

शहरातील वाहतूक कोंडी ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:40 AM

शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष : नागरिकांना पायी चालणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही.शिवाय सकाळी सायंकाळच्यावेळी शाळकरी विद्यार्थी वृध्द नागरिक रस्त्यावरुन ये-जा करीत असताना अती वेगाने येणारे दुचाकीस्वार ट्रॅक्टर चालकांच्या भीतीने रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत घेवून चालावे लागते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव रोड तसेच महात्मा गांधी चौकात वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांसह सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र याकडे पोलीस प्रशासनाची मात्र दुर्लक्ष होत आहे. गांधी चौकात पोलीस स्टेशनसमोरच वाहनाची लांबच लांब रांग लागत असताना पोलीस कारवाई करताना दिसून येत नाही.नागरिकांची मानसिकता बदलेनाजवळपास दहा वर्षापुर्वी रस्त्याच्या एका कडेला वाहने पार्क केली जावी, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात कोंडलेला रस्त्याचा श्वास आधीच गुदमरलेला असतांना नागरिकांचीही मानसिकता बदलायला तयार नाही. अशा स्थितीत वाहतुक शाखेचे कर्मचारीही हतबल दिसतात. एकट्या पोस्टआॅफीस चौकातही अशीच स्थिती दिसून येते. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या भंडारा शहरातील मुख्य रस्त्याचे हाल झाले असताना त्यावर कायम तोडगा निघालेला नाही.रस्त्यावर जनावरांचे बस्तानदीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचे वास्तव्य दिसून येते. अशावेळी लहान मोठे अपघातही घडले आहेत. शहरात बेवारस जनावरांसाठी कांजी हाऊसची व्यवस्था असतानाही पालिका प्रशासनाने त्याच्या देखभालीकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरुन रहदारीला अडथळा निर्माण करीत असतात. यावर पालिका प्रशासन गांभिर्याने निर्णय घेणार काय असा सवालही उपस्थित होतो.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी