शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
4
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
5
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
6
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
7
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
8
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
9
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
10
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
11
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
12
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
13
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
14
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
15
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
16
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
17
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
18
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

Video : भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स नदीत कोसळली; सहा ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 19:26 IST

साकोली-लाखांदूर मार्गावरील धर्मपुरी येथील चुलबंद नदीवर हा अपघात झाला.

- संजय साठवणे

साकोली (भंडारा) : अवैध प्रवासी वाहतूक करणारी भरधाव काळीपिवळी जीप पुलावरून नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात साकोली ते लाखांदूर मार्गावरील कुंभली गावाजवळील चुलबंद नदीवर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडला. मृतांमध्ये चार विद्यार्थिनी असून बारावीत उत्तीर्ण झाल्यानंतर बीएससीच्या प्रवेशासाठी त्या साकोली येथे आल्या होत्या. 

शीतल सुरेश राऊत (१२), अश्विनी सुरेश राऊत (२२) दोघीही राहणार सानगडी, शिल्पा श्रीरंग कावळे (२०), शारदा गजानन गोटफोडे (४५) दोघेही राहणार सासरा, सुरेखा देवाजी कुंभरे (२०) रा.सासरा टोली आणि गुनगुन हितेश पालांदुरकर (१५) रा.गोंदिया अशी मृतांची नावे आहेत. तर वंदना अभिमन सतीमेश्राम (५०), डिंपल श्रीरंग कावळे (१८), अभिमन तातोबा सतीमेश्राम (४५) तिघेही राहणार सासरा, शुभम नंदलाल पातोळे (२०) रा.तई, विणा हितेश पालांदूरकर (३०), सिद्धी हितेश पालांदुरकर (५) दोघेही राहणार गोंदिया आणि मालन तुळशीराम टेंभुर्णे (६५) राहणार खोलमारा जैतपूर अशी जखमींची नावे आहेत. यापैकी वंदना, डिंपल व शुभमची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

साकोली येथून प्रवासी घेऊन काळीपिवळी जीप (क्रमांक एमएच ३१ एपी ८२४१) लाखांदुरकडे मंगळवारी दुपारी जात होती. कुंभली येथील चुलबंद नदीपुलावर समोरुन आलेल्या वाहनाने काळीपिवळी जीपला डॅश दिला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप थेट ४० फुट खोल चुलबंद नदीच्या पात्रात कोसळली. अपघाता एवढा भीषण होता की, काळीपिवळीचा अक्षरश: चुराडा झाला होता. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच साकोलीचे ठाणेदार बंडोपंत बनसोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जीपमधून सासरा आणि सानगडी येथील बहुतांश प्रवाशी प्रवास करीत होते. सासरा व सानगडी येथील बारावीत उत्तीर्ण विद्यार्थिनी साकोली येथे बीएससीच्या प्रवेशासाठी आल्या होत्या. गावी परत जाण्यासाठी या जीपमधून त्या प्रवास करीत होत्या. मृतामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.

अपघाताचे वृत्त सानगडी आणि सासरा येथे कळताच गावकºयांनी साकोली येथील रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताने संपूर्ण भंडारा जिल्ह्यावर शोककळा पसरली.

अवैध प्रवासी वाहतुकीचे बळीभंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून कालबाह्य वाहनातून प्रवास घडविला जातो. कुंभलीजवळ झालेल्या अपघातातील बळी हे अवैध प्रवासी वाहतुकीचेच आहेत. साकोली येथून विविध मार्गावर दिवसभरातून ५० ते ६० वाहने प्रवासी वाहतूक करतात. मात्र पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही.

 

टॅग्स :Accidentअपघात