शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

तिसऱ्या दिवशीही मादी बिबट फिरकलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:48 IST

ऊसाच्या शेतीत लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर शुक्रवारच्या रात्रीपर्यंत त्या परिसरात ही मादी बिबट फिरकली नाही.

ठळक मुद्देवनविभागाची हालचालींवर नजर : शेत जाळल्याचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

नंदू परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऊसाच्या शेतीत लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर शुक्रवारच्या रात्रीपर्यंत त्या परिसरात ही मादी बिबट फिरकली नाही. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या बिबट्यांच्या पिलांवर नजर ठेऊन असले तरी वाढत्या तापमानामुळे या पिलांना काही धोका झाल्यास वनविभाग अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवसागणिक वनविभागाची चिंता बळावली आहे.कोका अभयारण्याशेजारी असलेल्या नवेगाव येथील ऊसाच्या शेतात एका मादी बिबटने दोन पिलांना जन्म दिला होता, हे वनविभागाला माहित होते. त्यानंतर वनविभाग या प्रकारावर पाळत ठेऊन होता. परंतु बुधवारला त्या शेतात आग लागल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तिथे वनपरिक्षेत्राधिकारी वासीम खान, वनरक्षक डोंगरे व वनमजूर होते. आग या पिलांच्या जवळ पोहोचत होती. त्यामुळे वरिष्ठ वनअधिकाºयांच्या मार्गदर्शनात या सर्वांनी त्या पिलांना सुरक्षित स्थळी हलविले. त्याठिकाणी कॅमेरा लावण्यात आले. परंतु, बुधवारच्या रात्रीपासून शुक्रवारच्या रात्रीपर्यंत ही मादी बिबट त्या परिसरात आली नाही.दरम्यान, गुरूवारला मातेच्या दुधाअभावी ही पिले निस्तेज पडल्याचे लक्षात येताच नागपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरूण खोलकुटे यांच्या मार्गदर्शनात पिलांना ग्लुकोज देण्यात आले. सध्या ही पिले सुदृढ असली तरी त्यांना मातेच्या दुधाची गरज आहे. शेतातील जळण्याचा वास निघून गेल्यानंतर ही मादी बिबट शेतात येईल, असा अंदाज डॉ.खोलकुटे यांनी व्यक्त करून ज्याठिकाणाहून पिलांना आणले त्याच ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरूवारी रात्री पिलांना जुन्याच ठिकाणी ठेवण्यात आले होते. परंतु मादी बिबट आलेली नाही.पिलांची काळजी घेणे ठरले आव्हानपुणे जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे बिबट्याच्या पिलांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याबाबत डॉ.खोलकुटे यांनी जुन्नर येथील डॉ.देशमुख यांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला वनविभागाला दिला. त्यानुसार लहान बाळांना देण्यात येणारे ‘लॅक्टोजीन इनफंट’चे पाच ग्रॅम पावडर हे पाच ग्रॅम पाण्यात मिश्रित करून दर तीन तासांनी पिलांना देण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार हे दूध देण्यात येत आहे. या पिलांची काळजी घेण्यासाठी या पिलांना भाजी ठेवण्याचे कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आहे. दिवसभर गारवा असलेल्या ठिकाणी ठेऊन रात्री ज्याठिकाणी पिले आढळून आली त्याठिकाणी दुसºया कॅरेटमध्ये झाकून ठेवण्यासाठी सांगितले आहे. सध्या हा प्रकार सुरू असला तरी मादी बिबट अद्याप न आल्यामुळे वनविभागाची चिंता बळावत आहे.भंडाºयातील पहिली घटनापुणे व नाशिक जिल्ह्यात ऊसाची शेती केली जाते. तिथे ऊसाच्या शेतात मादी बिबटाने पिलांना जन्म दिल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परंतु भंडारा जिल्ह्यात ऊसाच्या शेतात मादी बिबटने जन्म दिल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या पिलांना हाताळताना नेमकी कोणती खबरदारी घ्यायची याबाबत वनविभागाची दमछाक होत आहे.