शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

तिसऱ्या दिवशीही मादी बिबट फिरकलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:48 IST

ऊसाच्या शेतीत लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर शुक्रवारच्या रात्रीपर्यंत त्या परिसरात ही मादी बिबट फिरकली नाही.

ठळक मुद्देवनविभागाची हालचालींवर नजर : शेत जाळल्याचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

नंदू परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऊसाच्या शेतीत लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर शुक्रवारच्या रात्रीपर्यंत त्या परिसरात ही मादी बिबट फिरकली नाही. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या बिबट्यांच्या पिलांवर नजर ठेऊन असले तरी वाढत्या तापमानामुळे या पिलांना काही धोका झाल्यास वनविभाग अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवसागणिक वनविभागाची चिंता बळावली आहे.कोका अभयारण्याशेजारी असलेल्या नवेगाव येथील ऊसाच्या शेतात एका मादी बिबटने दोन पिलांना जन्म दिला होता, हे वनविभागाला माहित होते. त्यानंतर वनविभाग या प्रकारावर पाळत ठेऊन होता. परंतु बुधवारला त्या शेतात आग लागल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तिथे वनपरिक्षेत्राधिकारी वासीम खान, वनरक्षक डोंगरे व वनमजूर होते. आग या पिलांच्या जवळ पोहोचत होती. त्यामुळे वरिष्ठ वनअधिकाºयांच्या मार्गदर्शनात या सर्वांनी त्या पिलांना सुरक्षित स्थळी हलविले. त्याठिकाणी कॅमेरा लावण्यात आले. परंतु, बुधवारच्या रात्रीपासून शुक्रवारच्या रात्रीपर्यंत ही मादी बिबट त्या परिसरात आली नाही.दरम्यान, गुरूवारला मातेच्या दुधाअभावी ही पिले निस्तेज पडल्याचे लक्षात येताच नागपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरूण खोलकुटे यांच्या मार्गदर्शनात पिलांना ग्लुकोज देण्यात आले. सध्या ही पिले सुदृढ असली तरी त्यांना मातेच्या दुधाची गरज आहे. शेतातील जळण्याचा वास निघून गेल्यानंतर ही मादी बिबट शेतात येईल, असा अंदाज डॉ.खोलकुटे यांनी व्यक्त करून ज्याठिकाणाहून पिलांना आणले त्याच ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरूवारी रात्री पिलांना जुन्याच ठिकाणी ठेवण्यात आले होते. परंतु मादी बिबट आलेली नाही.पिलांची काळजी घेणे ठरले आव्हानपुणे जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे बिबट्याच्या पिलांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याबाबत डॉ.खोलकुटे यांनी जुन्नर येथील डॉ.देशमुख यांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला वनविभागाला दिला. त्यानुसार लहान बाळांना देण्यात येणारे ‘लॅक्टोजीन इनफंट’चे पाच ग्रॅम पावडर हे पाच ग्रॅम पाण्यात मिश्रित करून दर तीन तासांनी पिलांना देण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार हे दूध देण्यात येत आहे. या पिलांची काळजी घेण्यासाठी या पिलांना भाजी ठेवण्याचे कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आहे. दिवसभर गारवा असलेल्या ठिकाणी ठेऊन रात्री ज्याठिकाणी पिले आढळून आली त्याठिकाणी दुसºया कॅरेटमध्ये झाकून ठेवण्यासाठी सांगितले आहे. सध्या हा प्रकार सुरू असला तरी मादी बिबट अद्याप न आल्यामुळे वनविभागाची चिंता बळावत आहे.भंडाºयातील पहिली घटनापुणे व नाशिक जिल्ह्यात ऊसाची शेती केली जाते. तिथे ऊसाच्या शेतात मादी बिबटाने पिलांना जन्म दिल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परंतु भंडारा जिल्ह्यात ऊसाच्या शेतात मादी बिबटने जन्म दिल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या पिलांना हाताळताना नेमकी कोणती खबरदारी घ्यायची याबाबत वनविभागाची दमछाक होत आहे.