शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या आवासून उभ्या असतांनाही प्रशासनातर्फे समस्या सोडविण्यात येत नाही. त्यामुळे बहूजन रिपब्लिकन विद्यार्थीमोर्चा जिल्हा शाखेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट ऑफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकजुटीच्या माध्यमातून एकत्रीत येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.हल्लाबोल महामोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह बेरोजगारांनी सहभाग घेतला. मागण्यांमध्ये जिल्ह्यामध्ये ओबीसी वसतीगृह स्थापन करण्यात यावे, पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या जागेत वाढ करावी अन्यथा पोलीस भरती रद्द करण्यात यावी. इतर शासकीय वसतीगृहात ओबीसी प्रवर्गाच्या जागा वाढविण्यात याव्या, त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळावा, शिष्यवृत्तीत वाढ करावी, देशात होणारे खासगीकरण थांबविण्यात यावे, रोजगार निर्मितीसाठी विदर्भ राज्याची स्थापना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.मोर्च्यात बेरोजगारांचीही उपस्थितीविद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्च्यात विद्यार्थ्यांसह बेरोजगारांनी उपस्थिती लावली होती. या मोर्च्यात बीआरव्हीएमचे योगेश शेंडे, शुभम रामटेके, पंकज पडोळे, निशांत बडोले, शामिल गजघाटे, शशांक रंगारी, पलास चुटे, वासंती भुरे, अंजली भाजीपाले, पंकज पतरे, शुभम रहांगडाले, पुजा सारवे, निशा पारधी, भावना शहारे, प्रतिक गजभिये, सुशांत नागदेवे, पितांबर गौपाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी ९ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही मागण्यांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यानंतर पुन्हा २१ आॅगस्टला निवेदन देण्यात आले. त्यावेळी शासनाला अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही समस्या सुटली नसल्याने अखेर मोर्च्याचा मार्ग पत्करला.

टॅग्स :Studentविद्यार्थीMorchaमोर्चा