शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अडगळीतले साहित्य जमा करीत भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तयार केली सायकल रिक्षा व बैलगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 22:00 IST

Bhandara News Students टाकाऊ वस्तुतून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या कल्पक बुद्धीने प्रेरित झालेले लाखनी तालुक्यातील सोनमाळा व धानला (खराशी) येथील विद्यार्थ्यांनी सायकल रिक्षा व बैलबंडी बनवली.

ठळक मुद्देसोनमाळा व धानला (खराशी) विद्यार्थ्यांचे बौद्धिक ज्ञान प्रेरणादायी

 लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : टाकाऊ वस्तुतून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या कल्पक बुद्धीने प्रेरित झालेले लाखनी तालुक्यातील सोनमाळा व धानला (खराशी) येथील विद्यार्थ्यांनी सायकल रिक्षा व बैलबंडी आपल्याच कल्पक बुद्धीतून घडवली. नकारात्मकता झटकत सकारात्मक विचाराने एकत्रित आलेले गावचे विद्यार्थी परिसरात कौतुकास्पद ठरले.

कोरोना संकटाने सर्वांनाच संकटात ओढलेले आहे. या संकटात शाळा सुद्धा सापडलेल्या असून गत आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. परंतु ग्रामीण भागात विद्यार्थी आई-वडिलांपासून मोकळे होत मित्रमंडळींसोबत खुल्या रानावनात, गावातील मोकळ्या जागेत एकत्र येत कल्पना बुद्धीला चालना देत नवं करण्याच्या भूमिकेत आढळले. लाखनी तालुक्यातील सोनमाळा व धानला खराशी येथील विद्यार्थ्यांनी सायकल रिक्षा व बैलबंडी अडगळीतल्या घरच्याच साहित्यांनी बनवली. त्यांचे कल्पक बुद्धीचे पंख निश्चितच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख यासारखे प्रसंशनीय आहे.

ग्रामीण भागात अर्थव्यवस्था शेतीवर आजही ८० टक्केच्या वर अवलंबून आहे. घरातली करते मंडळी शेतीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ अपुरा असतो. अशात होतकरू कल्पक बुद्धी चे विद्यार्थी गावातील मित्रांसोबत एकत्रित येत नवं काही करण्याच्या प्रेरणेने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयात उत्साह असेल तो उत्साह पुढे आणीत इतरांना सुद्धा त्यांच्यात रममाण करीत अडगळीतल्या वस्तूंना टिकाऊ करीत कृषी क्षेत्रात उपयोगी पडणारे साहित्य तयार करण्याचा प्रयत्न करतात. एखादा कारखाना किंवा एखादे यंत्र तयार करण्याकरिता जशी अभियांत्रीकी शाळेतील अभियंते एकत्रित येत आपापल्या कलागुणांचा योग्य तो वापर करून अपेक्षित असलेले यंत्र घडवतात. अगदी तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा या कोरोणाच्या संकटकाळात आपली कल्पक बुद्धी वापरून आई-वडिलांना शेतीत उपयोगात असलेली साहित्य बनवीत इतरांना नवलात टाकले आहे . त्यांना भविष्यात योग्य ते मार्गदर्शन लाभल्यास निश्चितच त्यांची कल्पक बुद्धी गावासह देशाला सन्मान देईल हे निश्चित!

सोनमाळा व धानला खराशी येथील विद्यार्थ्यांनी सायकल व बैलगाडी घडवताना घरातलीच जुनाट असलेली निरुपयोगी ठरलेले साहित्य वापरीत कल्पक बुद्धीच्या योग्य तो वापर करून शेती उपयोगी साहित्य तयार केले. मी रस्त्याने प्रवास करताना त्यांच्या कलेकडे सहजतेने बघितले. त्यांनी वापरलेली कल्पक बुद्धी मला भावली. मी थांबून त्यांच्याकडून आस्थेने चौकशी केली. सायकल रिक्षा तयार करताना अडगळीतल्या जुन्या सायकलचे दोन चाक, आरसा, बांबू चे दोन राळ, त्यात पुढे चाक व हँडल असा रिक्षा घडवित मुले आनंदी दिसली. त्या रिक्षातून एकमेकाची बसून फेरी घातली.

धानला खराशी येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा शेतावरील छोट्या लाकडांचा व बांबूंच्या उपयोग करीत आकर्षक बैलबंडी घडवली. तात्पर्य हेच कि विद्यार्थ्यांना कल्पक बुद्धीचा व स्वातंत्र्याचा आधार दिल्यास निश्चितच त्यांच्या कल्पक बुद्धीला वाव मिळून भविष्यात विद्यार्थी निश्चितच काही नाही काही करतील . याकरिता पालक व शिक्षकांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना त्यांच्या सोयीने वाव देत प्रत्येक गावात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम निश्चितच दिसतील अशी आशा मला वाटते आहे.असे आमच्या शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशी अंतर्गत सर्वे निरीक्षणाअंती पुढे आलेला आहे.

-डमदेव कहालकर, संस्थाध्यक्ष शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशी.

 

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थी