शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाअभावी तंटामुक्त चळवळीला मरगळ

By admin | Updated: December 3, 2014 22:45 IST

शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भंडारा : शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु आता ही मरगळ आली आहे. मरगळ झटकण्यासाठी जनजागृतीची गरज असून तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्याची गरज आहे.
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गावकऱ्यांनी मनापासून सहकार्य केले तरच पोलीस, महसूल व न्यायालयीन यंत्रणेवरील ताण कमी होईल. आपसातील प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी लोकन्यायालयाची संकल्पना देखील प्रभावी माध्यम ठरत आहे. विकास ही एक प्रक्रिया असून त्यासाठी राजकारण विरहित प्रयत्नांची गरज आहे. परंतु सर्वसामान्य ग्रामीण लोकांच्या समस्यांचे भांडवल करीत प्रस्थापितवर्ग त्यांचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शोषण करीत असल्याने या शोषित ग्रामीण घटकांच्या वर्गामध्ये जोपर्यंत व्यक्तीगत क्षमता आणि वैचारिक परिवर्तन होत नाही. यासाठी व्यापक जनजागृतीच्या चळवळीची गरज आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा खर्च ठिक आहे पण दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जबाबदारी व समाजातील कार्याबद्दलची उजळणी तंटामुक्त समितीच्या सदस्यांमध्ये असली पाहिजे.
तंटामुक्त समितीचे थाटात गठण केले जाते. मात्र जबाबदारीने कामे करताना दिसत नाही. परंतु याचे श्रेय पोलीस प्रशासन घेतानाचेही चित्र आहे. पोलीस प्रशासनावर कामाचा व्याप खूप असल्यामुळे तंटामुक्ती समितीकडे हव्या त्या प्रमाणात लक्ष पुरविले जात नाही. समिती सदस्य अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना शासनाकडून आलेले परिपत्रकसुद्धा नीट समजत नाही. पोलीस पाटलांची जवळपास तीच गत, त्यातच समितीचे पदाधिकारी राजकीय पक्षांशी संबंधित असतात.
गावातील गटातटाच्या राजकारणामुळे अधिक तंटे निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पोलीस प्रशासनाकडून तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकांचे आयोजन होणे गरजेचे आहे. पदाधिकाऱ्यांना समाजाभिमूख प्रशिक्षण देवून तंटामुक्तीच्या कार्यात पारदर्शकता निर्माण करावी. तंटामुक्तीचे कार्य एन दोन दिवसांचे नसून सर्वांच्या पुढाकारानेच गावातील तंटे हद्दपार होऊ शकतील. या मोहिमेचे व्यापक यश केवळ लोकसहभागावरच अवलंबून असून त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत अनेक जाणकारांकडून व्यक्त होत आहे हे मात्र खरे. (शहर प्रतिनिधी)