शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थाने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

शिक्षण हे माणसाला सज्ञान बनविते त्यामुळे सर्वांगीण शिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात तरतूद केली आहे. ...

शिक्षण हे माणसाला सज्ञान बनविते त्यामुळे सर्वांगीण शिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात तरतूद केली आहे. त्यानुसार प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक , अभियांत्रिकी,वैद्यकीय यासारख्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची शासकीय तसेच

खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व सुरू असताना मात्र मार्च २०२० पासून कोरोना कोविड १९ या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने देशातील व राज्यातील सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थाने बंद करण्यात आले आहेत. सध्या इयत्ता नववी,दहावी, अकरावी, व बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. परंतु इतर वर्ग केव्हा सुरू होणार ही चिंता विद्यार्थी व पालकांना लागली आहे.

विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागत असून विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनवर विपरित परिणाम होत असून विद्यार्थी उनाडपने वागत असल्याची दस्तूर खुद्द पालकांची ओरड आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी,शेतकाम तसेच मोलमजुरी करण्यात व्यस्त असून त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.

व्यावसायिक ,तांत्रिक पदवी ,पदव्युत्तर अभ्यासक्र थर्ड वर्षाच्या परीक्षा केव्हा होणार असा प्रश्न पडला असून सदर वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थाने तत्काळ सुरू करणारा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी भीम शक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे एस. के वैद्य बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे ,माधव बोरकर ,हर्ष वर्धन, हुं म ने धनराज तिरपुडे, नरेंद्र कांबळे , कोमल कांबळे रतन मेश्राम, नंदू वाघमारे तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, शांताराम खोब्रागडे, फाल्गुन वंजारी,रूपा मेश्राम,दामोधर उके,नत्थु सूर्यवंशी उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यश जयपाल, रामटेके यशवंत घरडे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभूर्णे, उमाकांत काणेकर,यांनी एका लेखी निवेदनातून केली आहे.