शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: September 24, 2014 23:25 IST

कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक करून जादा दराने खतांची विक्री करण्यात येत आहे. पितृपक्षाला सुट्टी असतानाही काल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रात सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत

काळाबाजाऱ्यांना चपराक : रात्रीपर्यंत अधिकाऱ्यांनी केली विक्रीभंडारा : कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक करून जादा दराने खतांची विक्री करण्यात येत आहे. पितृपक्षाला सुट्टी असतानाही काल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रात सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत ठिय्या मांडून स्वत: खतांची विक्री केली. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.सुरूवातीला निसर्गाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर त्यानंतर सावकार व आता कृषी केंद्र संचालक शेतकऱ्याला लुबाडत आहे. शेतातील पिके डोलू लागली असतानाच पिकांवर अडींचा प्रादुर्भाव झाला आहे. किडींपासून वाचविण्यासाठी व पिकाला पोषक खतांचा पुरवठा देण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात मागील काही दिवसांपासून चकरा मारीत आहे. कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांची लुट करीत आहे. २९८ रुपयांची खतांची एक बॅग ४५० ते ५०० रूपयांना विकण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागाकडे केली. मागील आठवड्यापासून जिल्हा अधिक्षक कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी केंद्रांवर छापे घालने सुरू केले आहे.मंगळवारी पितृपक्षामुळे शासकीय सुट्टी असतानाही शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक एच. एल. कुदळे यांच्या मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक सुप्रिया कावळे यांच्यासह कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने पालांदूर, कोंढा व चिचाळा येथे छापे घातले. यावेळी केंद्रचालक शेतकऱ्यांकडून जादा रक्कम घेत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे या पथकाने पालांदूर येथील देशमुख कृषी केंद्र, श्रीराम कृषी केंद्र, कोंढा येथील जयबजरंग कृषी केंद्र व चिचाळ येथील वैरागडे कृषी केंद्र व शिवम कृषी केंद्रात स्वत: हजर राहून शेतकऱ्यांना खतांचे वाटप केले. एवढ्यावरच ते न थांबता खतांची आवश्यकता असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांना खते विक्री केली. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत ही खत विक्रीची प्रक्रिया पार पडली. दरम्यान खतांचे बीलबुक नोंदनी व पावती देण्याचे काम स्वत: कृषी विभागाच्या पथकाने केले. कृषी विभागाच्या या कारवाईने खतांचा काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्र संचालकांना चपराक बसली असून त्यांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)