शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

रेशीम उद्योगाला चालना मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:20 AM

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यापैकी रेशमी उद्योग हा शेती पुरक उद्योग असल्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. परंतु शासकीय धोरणानुसार लाभार्थ्यांना देयकासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने हा उद्योग संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देउद्योग संकटात : जिल्हा प्रशासनाच्या ताळमेळात देयके मिळण्यास दिर्घ कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यापैकी रेशमी उद्योग हा शेती पुरक उद्योग असल्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. परंतु शासकीय धोरणानुसार लाभार्थ्यांना देयकासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने हा उद्योग संकटात सापडला आहे.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योगासाठी उदासिनता दिसून येते. जिल्ह्यातील शेतकºयांना शेतीच्या माध्यमातून रेशीम उद्योग सुरू केल्यास सततच्या दुष्काळाला सामोरे जाण्याचे बळ शेतकºयांत येईल, रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडुन अनुदान दिले जाते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या ताळमेळात देयके मिळण्यास दिर्घ कालावधी लागत असल्याने शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरांत मोठया प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकऱ्यास कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे.तुती लागवड, निचरा होणाºया कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पन्नात वाढ होते. पट्टा पध्दतीस अत्यंत कमी पाणी लागते.एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात ३ एकर तुती जोपासता येते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १५ वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकांप्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यास देखील हा व्यवसाय करता येतो. परंतु जिल्ह्यात या उद्योगाला बळ मिळत नसल्याने शेतकरी रेशीम उद्योगापासून वंचित राहत आहेत.रोहयो योजनेतून मिळते अनुदानकमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून तो जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. यामुळे उत्पन्नात वाढ होते. शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम निर्मिती करण्यासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान दिले जाते.