शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शुभमंगल सावधानचा गजर झाला ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिका, कपडे खरेदी, वाजंत्री, किराणा यासह इतर वस्तू खरेदी होतात. परंतु यंदा लग्न सोहळेच नाही तर खरेदीही ठप्प झाली आहे. त्यातच अनेकांचा रोजगारही गेला आहे.

ठळक मुद्देलग्नसोहळे थांबले : आनंदाच्या उत्सवात कोरोनाचे विरजण

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : उन्हाळ्याची चाहूल लागली की सुरु होतो लग्नसराईचा हंगाम. गावागावांत अन् शहरातही घुमू लागतात शुभमंगल सावधानचा गजर. परंतु यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचे संकट आले. सर्व लॉकडाऊन झाले. आनंदाच्या उत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागले. कधी लॉकडाऊन संपते याची विवाह इच्छुकांना प्रतीक्षा लागली आहे.गावखेड्यात मार्च ते जून अखेरपर्यंत लग्नकार्य आयोजित केले जाते. मृग नक्षत्रापूर्वी लग्न आटोपण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यानंतर लग्नकार्य होत नाही. डिसेंबर, जानेवारीपासून स्थळ शोधण्यास प्रारंभ होतो. पसंती आटोपली की साक्षगंध पार पडतो. त्यानंतर सुरु होते लग्नाच्या खरेदीची गडबड. खरेदी आटोपली की आप्तस्वकीयांना पत्रिका वितरीत करून लग्नाला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले जाते.यंदा मात्र अशी धामधूम कुठेच दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरोनाचे काळे ढग घोंगावू लागले होते. मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिका, कपडे खरेदी, वाजंत्री, किराणा यासह इतर वस्तू खरेदी होतात. परंतु यंदा लग्न सोहळेच नाही तर खरेदीही ठप्प झाली आहे. त्यातच अनेकांचा रोजगारही गेला आहे.आनंदाच्या सोहळ्यात कोरोनाने विरजण घातले असून विवाहोच्छूक मंडळी आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र हा लॉकडाऊन केव्हा संपेल हे कुणीही सांगत नाही. कोरोनाच्या या महासंकटाने सर्वांना हादरवून सोडले असून सर्वच जण आता घराबाहेर पडण्यासाठी उत्सूक झाले आहेत. मात्र सर्वाधिक अडचण होत आहे ती वधू-वर पित्यांची.‘ऐका सत्यनारायणाची कथा’ही थांबलीग्रामीण भागात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची कथा करण्याची परंपरा आहे. चौरंग, केळीचे खुंट, पाण्याचा कलश, नवग्रहाच्या आणि अष्टदिशांच्या सुपाऱ्या आदीसह प्रसाद अशी सामुग्री तयार करून पूजा केली जाते. ध्वनीक्षेपकावरून ऐका सत्यनारायणाची कथा हे गीत ऐकू येते. मात्र यंदा शुभकार्यच नाही तर सत्यनारायणाची कथा तरी कोण करणार आणि त्यावर अवलंबून असणारे पुरोहितही बेजार झाले आहेत.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या