शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शुभमंगल सावधानचा गजर झाला ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिका, कपडे खरेदी, वाजंत्री, किराणा यासह इतर वस्तू खरेदी होतात. परंतु यंदा लग्न सोहळेच नाही तर खरेदीही ठप्प झाली आहे. त्यातच अनेकांचा रोजगारही गेला आहे.

ठळक मुद्देलग्नसोहळे थांबले : आनंदाच्या उत्सवात कोरोनाचे विरजण

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : उन्हाळ्याची चाहूल लागली की सुरु होतो लग्नसराईचा हंगाम. गावागावांत अन् शहरातही घुमू लागतात शुभमंगल सावधानचा गजर. परंतु यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचे संकट आले. सर्व लॉकडाऊन झाले. आनंदाच्या उत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागले. कधी लॉकडाऊन संपते याची विवाह इच्छुकांना प्रतीक्षा लागली आहे.गावखेड्यात मार्च ते जून अखेरपर्यंत लग्नकार्य आयोजित केले जाते. मृग नक्षत्रापूर्वी लग्न आटोपण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यानंतर लग्नकार्य होत नाही. डिसेंबर, जानेवारीपासून स्थळ शोधण्यास प्रारंभ होतो. पसंती आटोपली की साक्षगंध पार पडतो. त्यानंतर सुरु होते लग्नाच्या खरेदीची गडबड. खरेदी आटोपली की आप्तस्वकीयांना पत्रिका वितरीत करून लग्नाला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले जाते.यंदा मात्र अशी धामधूम कुठेच दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरोनाचे काळे ढग घोंगावू लागले होते. मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिका, कपडे खरेदी, वाजंत्री, किराणा यासह इतर वस्तू खरेदी होतात. परंतु यंदा लग्न सोहळेच नाही तर खरेदीही ठप्प झाली आहे. त्यातच अनेकांचा रोजगारही गेला आहे.आनंदाच्या सोहळ्यात कोरोनाने विरजण घातले असून विवाहोच्छूक मंडळी आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र हा लॉकडाऊन केव्हा संपेल हे कुणीही सांगत नाही. कोरोनाच्या या महासंकटाने सर्वांना हादरवून सोडले असून सर्वच जण आता घराबाहेर पडण्यासाठी उत्सूक झाले आहेत. मात्र सर्वाधिक अडचण होत आहे ती वधू-वर पित्यांची.‘ऐका सत्यनारायणाची कथा’ही थांबलीग्रामीण भागात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची कथा करण्याची परंपरा आहे. चौरंग, केळीचे खुंट, पाण्याचा कलश, नवग्रहाच्या आणि अष्टदिशांच्या सुपाऱ्या आदीसह प्रसाद अशी सामुग्री तयार करून पूजा केली जाते. ध्वनीक्षेपकावरून ऐका सत्यनारायणाची कथा हे गीत ऐकू येते. मात्र यंदा शुभकार्यच नाही तर सत्यनारायणाची कथा तरी कोण करणार आणि त्यावर अवलंबून असणारे पुरोहितही बेजार झाले आहेत.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या