शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी रंगभूमीने आता सोशल साईटवर कोरले नाव!

By admin | Updated: November 28, 2015 01:48 IST

झाडीपट्टी रंगभूमीतील नाटक कंपन्यांनी आता फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर स्वत:चे फेसबुक खाते उघडून ...

लाखांदूर : झाडीपट्टी रंगभूमीतील नाटक कंपन्यांनी आता फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर स्वत:चे फेसबुक खाते उघडून त्यावरुन आपल्या कंपनीतील नाटकांचे पोस्टर आॅनलाईन पोस्ट करीत आहेत. सदर पोस्ट सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित होते. याचाच अर्थ झाडीची नाटक झाडीपट्टीच्या सीमा पार करुन ग्लोबल झाली आहे. यातून नाटक कंपन्यांनी नाटकांचा आॅनलाईन प्रचार व प्रसार करुन झाडीपट्टी रंगभुमीच्या इतिहासात सोनेरी पान लिहिले आहे.कवी कुलगुरु कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख ‘सौराज्य रम्य’ अशा सार्थ शब्दात केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत करता येतो. या झाडीच्या पट्टीत बोलली जाणारी बोलीभाषा म्हणजे झाडीबोली. या चार जिल्ह्यांच्या विस्तीर्ण अशा भूभागावर पसरलेल्या हिरव्यागार घनदाट वनराईमुळे हा भाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो.झाडीपट्टी रंगभुमीला १०० पेक्षा जास्त वर्षांची समृद्ध अशी परंपरा आहे. १९ व्या शतकाचा शेवट आणि २० व्या शतकाचा प्रारंभ काळ म्हणजे संशोधनाच्या संक्रमणाचा होता. त्यावेळी झाडीपट्टीच्या प्रदेशात दळणवळणाची आणि मनोरंजनाची आजसारखी अतिवेगवान संपर्काची साधने नव्हती. परिणामी येथील नागरिकांना स्वत:च्या अंगभूत कलाकौशल्यातूनच परस्परांचे मनोरंजन करावे लागत असे. झाडीपट्टीतील खेड्यांमध्ये इंग्रज कालखंडात मालगुजार, जमीनदार, पाटील यांनी दंडार, नाट्य आणि संगीत नाटकांना आश्रय दिला. चांगले कलावंत, संगीतकार, वाद्यवृंदवादक यांना हेरून त्यांना बाहेरून आणून जमीन व घरे दिली. दंडार वा संगीत नाटक यांचे आयोजन पैशाचा विचार न करता फक्त मनोरंजन म्हणून केल्या जात असे. दंडारनाट्यात पौराणिक कथांचे प्रतिबिंब तर नाटक प्राचीन धार्मिक, आध्यात्मिक कथानकांवर आधारित असत. झाडीच्या प्रदेशात गावोगावी होळी, दिवाळी, दसरा सणांना वा विशिष्ट दिनी दंडार व नाटकांचे प्रयोग होत असत. परंतु दंडार व नाटक प्रयोग करायचा असल्यास कथानक, कलाकार, नेपथ्थ, सिनसिनेरी, वाद्यवृंदवादक, पार्श्वगायकाची गरज असते. १०० वर्षांपूर्वी हे सर्वजण एकाच वेळेस, एकाच छताखाली उपलब्ध होणे अशक्यप्राय होते. आजच्यासारखी तेव्हा दळणवळण, संपर्क, प्रचार (पत्रके) साधने नव्हती. गावी आलेले पाहुणेमंडळी स्वगावी गेल्यानंतर पाहिलेल्या दंडार वा नाटकांचे आयोजन करीत म्हणजे प्रेक्षकांकडूनच दंडार, नाटक प्रयोगांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रचार व प्रसार होत असे. (तालुका प्रतिनिधी)