शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

दीड लाख हेक्टरवरील रोवणी प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 5:00 AM

भंडारा जिल्ह्यात एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार मशागत करून शेतात पऱ्ह्यांची नर्सरी तयार केली. रोहिणी मृग नक्षत्रात चांगला पाऊस बरसला. शेतकरी सुखावला. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. रोवणीचे सोड शेतातील नर्सरीतील पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली.

ठळक मुद्देपाऊस लांबणीवर : दुबार पेरणीचे संकट बळावण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: वैनगंगा नदीकाठासह सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी धानरोवणी केली असली तरी पावसाअभावी शेतकरी संकटात आले आहेत. सिंचनाची सोय असलेल्या भागासह ईतर ठिाणी पाच टक्के क्षेत्रात रोवणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवणी रखडली असून दुबार पेरणीचे संकटही बळावले आहे.भंडारा जिल्ह्यात एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार मशागत करून शेतात पऱ्ह्यांची नर्सरी तयार केली. रोहिणी मृग नक्षत्रात चांगला पाऊस बरसला. शेतकरी सुखावला. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. रोवणीचे सोड शेतातील नर्सरीतील पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली. ओलीताचे क्षेत्र असलेले शेतकरी सिंचनाने पऱ्हे जगवू लागले. परंतु कोरडवाहू शेतकरी डोक्यावर गुंडाने पाणी आणून पºह्यांना जगवित असल्याचे चित्र दिसू लागले.एकूण लागवड क्षेत्राच्या केवळ ५६७७.२८ हेक्टरवर आतापर्यंत रोवणी आटोपली आहे. त्यातही ओलीताची सोय असलेल्या शेतकºयांचाच सर्वाधिक समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रोवणी तुमसर तालुक्यात १३५३ हेक्टर तर सर्वात कमी साकोली तालुक्यात ३६७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. जिल्ह्यात १३ हजार १६ हेक्टर क्षेत्रावर नर्सरी टाकण्यात आली होती.गत आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी केलेल्या अनेक शेतात भेगा पडल्या असून पºहे करपू लागली आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने कोरडवाहू असलेल्या मोहाडी,भंडारा तालुक्यातील शेतकरी प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. कमी पाऊस असलेल्या मोहाडी तालुक्यातील कोरडवाहू करडी परिसरात सुमारे ५,४६४ हेक्टर आर क्षेत्रात धान पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सुमारे १९७ हेक्टर क्षेत्रात धुऱ्यावर तूर पिकाची लागवड परिसरात करण्यात आली.जिल्ह्यात जंगल मोठ्या प्रमाणात असतानाही पाऊस कमी होत चालल्याने शेतकरी धास्तावला आहे. गत वर्षी पुरेसा पाऊस झाला असताना असताना भुगर्भात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. अनेक तलावांतील अतिक्रमणे व उथळपणांमुळे जलसाठा राहत नाही. विहिर खोदली तरी खरीपातही पाणी पुरत नाही.अशा बिकट परिस्थितीतही निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकरी आजही चांगल्या उत्पन्नाची आशा धरून आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडा गेल्यानतर शेतकऱ्यांना रोवणी कशी करायची असा प्रश्न पडला आहे.काही आठवड्यापासून शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले आहेत. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. आणखी काही दिवसांत पाऊन न झाल्यास केलेली शेतकऱ्यांची मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्याना सतावत आहे.जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असतांना केवळ आठ तास वीज पुरवठा होत असल्याने सिंचन करता येत नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी बारा तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. नागपूर जिल्ह्यात १२ तास वीज पुरवठा होतो. तर भंडारा जिल्ह्यात कोणती समस्या आहे. असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. विजेसाठी शेतकरी विज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती