शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पाऊस धुव्वाधार, पण जलप्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:38 IST

चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.

ठळक मुद्दे१८ टक्केच जलसाठा : दीड महिन्यात वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. मंगळवारपर्यंत संततधार पाऊस कोसळला. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै पर्यंत ५३५.३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या जवळपास निम्मा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ५८८.२ मिमी त्याखालोखाल भंडारा ५५९.८ मिमी, मोहाडी ५४२.९ मिमी, तुमसर ५२७.२ मिमी, पवनी ७७९.४ मिमी, लाखांदूर ५२९.५ मिमी, लाखनी ५२०.४ मिमी झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ २८६.१ मिमी पाऊस झाला.या पावसाने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले. अनेक गावातील घरांना पुराचा फटका बसला. काही घरांचे अंशत: नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसान झालेल्या भागाचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.सर्वत्र धुव्वाधार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र १८.७२२ टक्के जलसाठा आहे. त्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार मध्यम प्रकल्पात केवळ १६.४३ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये २१.१३ टक्के आणि माजी मालगुजारी तलावांमध्ये १९.५८ टक्के जलसाठा आहे. पाऊस दमदार होऊनही जलसाठा वाढला नाही. त्यामुळे आणखी धुव्वाधार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान गत तीन दिवसाच्या पावसाने रोवणीच्या कामाला जिल्ह्यात वेग आला आहे.मध्यम प्रकल्पात १६.४३ टक्के पाणीतुमसर तालुक्यातील चांदपूर प्रकल्पात ११.३३ टक्के, बघेडा प्रकल्पात ५९.८६ टक्के, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली प्रकल्पात २३.२६ टक्के आणि सोरणा प्रकल्पात केवळ ३.४१ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. सध्या या प्रकल्पात ०.९७८ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.