शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता चांगली असावी

By admin | Updated: March 28, 2015 00:30 IST

बचत गटांच्या माध्यमातून काही प्रकल्प सुरू होतात.

भंडारा : बचत गटांच्या माध्यमातून काही प्रकल्प सुरू होतात. मात्र थोड्या कालावधीनंतर ते बंद पडतात. असे होऊ नये यासाठी उत्पादनाची गुणवत्ता चांगली असली तरच ते स्पर्धेत टिकतील. तुम्ही लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात परिवर्तन होण्यासाठी चांगले काम करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी यांनी केले.आंधळगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ओमसाई महिला कोसावस्त्र उत्पादक गटाने कोसा कापड विणण्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी श्री द्विवेदी बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य डॉ. उल्हास बुराडे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, रेशीम विकास अधिकारी रायसिंग, माविमच्या जिल्हा समनव्यक ज्योती निभोंरकर उपस्थित होत्या.द्विवेदी म्हणाले, आंधळगावमध्ये सुतकताई आणि विणकाम एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावर्षी जिल्हा परिषदेकडून ४ हातमाग खरेदी करण्यासाठी निधी देणार आहे. यातून बचत गटातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे हा मुख्य उद्देश आहे. तुमच्यावर टाकलेला विश्वास तुम्ही सार्थ ठरवणार, अशी खात्री आहे.डॉ. उल्हास बुराडे म्हणाले, आंधळगाव ही विणकरांची भूमी आहे. पण विणकाम हा कोणत्याही एका विशिष्ट समाजाचा व्यवसाय होऊ शकत नाही. या व्यवसायात येवून आंधळगावला नवीन ओळख निर्माण करून द्यावी, असे त्यांनी आवाहन केले. ज्योती निंभोरकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)