शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींच्या निर्णयाला बसला प्रस्तावाचा फटका

By admin | Updated: September 16, 2014 23:31 IST

भंडारा जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयातील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयात पोहचला नाही. परिणामी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या प्रस्तावामुळे

प्रक्रिया रखडली : ग्रामविकास खात्याऐवजी प्रस्ताव पोहोचला नगरविकास खात्याकडेसंजय साठवणे - साकोली भंडारा जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयातील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयात पोहचला नाही. परिणामी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या प्रस्तावामुळे राज्यभरातील निर्णय प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. एका जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका राज्यातील ग्रामपंचायतीना कारणीभूत ठरला आहे.महाराष्ट्र राज्यातील तालुकास्तरीय ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतला होता. त्यानुसार राज्यातील १३९ ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर होणार होते. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व तहसील कार्यालयातून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र या प्रक्रियेचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेला मंत्रालयात पाठवायचा होता. परंतु, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल न पाठविल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील नगरपंचायतची घोषणा झाली नाही.साकोली, लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी या चार ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरु झाल्या होत्या. यावरून ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतने ठराव घेतला. ग्रामपंचायतने हा ठराव पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाकडे पाठविला. त्यानंतर नगरपंचायतीचा जाहिरनामा त्या-त्या ग्रामपंचायतीत काढण्यात आला. एकंदरीत तालुका पातळीवर होणारी ही प्रक्रिया तालुका प्रशासनाने पूर्ण करून संपूर्ण कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली. या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सपाटे व दिलीप मासूरकर यांनी या प्रकरणाची चौकशी करीत मुंबई गाठली. ग्रामीण विकास मंत्रालयात चौकशी केली असता भंडारा जिल्हा परिषदेने चारही ग्रामपंचायतीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला न्सासल्याची माहिती उघडकीस आली. त्यामुळे त्यांनी आज मंगळवारला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन या प्रकरणाविषयी चर्चा केली असता या संपूर्ण अहवाल ग्रामविकास मंत्रालयात न पाठविता हा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. या चुकीमुळे नगरपंचायतीची प्रक्रिया मात्र रखडल्या गेली आहे.