शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदपुरीत जीर्ण घरांचे खचणे सुरूच

By admin | Updated: July 26, 2014 01:26 IST

सिंदपुरी गावात तलावाची पाळ फुटल्याने दोनशेहून अधिक घरात

शेतीचे नुकसान : ७०० नागरिक बेघरचुल्हाड (सिहोरा) : सिंदपुरी गावात तलावाची पाळ फुटल्याने दोनशेहून अधिक घरात पाणी शिरले. आता ही घरे खचायला सुरूवात झाली आहे. नुकसानग्रस्तांना मदत घोषित झालेली नसून जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली.सिंदपुरी गाव शिवारातील १५० एकरातील तलावाची पाळ फुटली. या तलावातून जाणारे पाणी गावात शिरले. यामुळे आपादग्रस्तांची सुविधा शाळा आणि समाज मंदिरात करण्यात आली आहे. बेघर कुटूंबियांचे गावकरीच कैवारी झाले आहेत. गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून बेघर कुटूंबियांना आधार दिला आहे. ज्या घरात तलावाचे पाणी शिरले आहे अशा घरात वास्तव्याची भिती बळावली आहे. गावातील तलावांचे पाणी ओसरताच घरांचे खचणे सुरू झाले आहे. काही घरे एक ते दोन फुटपर्यंत जमिनीत खचले आहे. याशिवाय अनेक घरांच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत. ४५० घरे असलेल्या या गावात अर्ध्याधिक घरे पाण्यात आहेत. तलावातील पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. या पाण्यामुळे सिंचीत होणारी १५० एकर शेती बाधित झाली आहे. या शेतीत धानाची रोवणी करता येणार नाही. याशिवाय तलावाच्या पाण्याने धानाची नर्सरी वाहून गेली आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध करणे अडचणीचे झाल्यामुळे गावकरी संकटात सापडले आहेत. गुरूवारला जिल्हाधिकारी माधवी खोडे यांनी गावाला भेट देऊन तलावाची पाहणी केली. बेघर कुटूंबियांची विचारपूस केली. याशिवाय अंशत: व पुर्णत: नुकसानग्रस्त घरांचे सर्वेक्षणाचे निर्देश यंत्रणेला दिले. शेतीचे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. परंतु मदतीची सोय मिळाली नाही. जिल्हा परिषद शाळा अधिक काळ बंद ठेवता येणार नाही. बेघर कुटूंब जीर्ण घरात जाण्याच्या तयारीत नाहीत. सर्वेक्षणानंतर मदत वाटपाला विलंब लागणार आहे. यादरम्यान उद्या दि.२६ रोजी सिंदपुरी येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनात ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कलाम शेख, वामन सिंगनजुडे, सुंदर बोरकर, देवानंद वासनिक, बिंदू मोरे, मोतीलाल ठवकर यांनी केले आहे. (वार्ताहर)दोन विभागात जुगलबंदीसमाज मंदिरात आयोजित बैठकीत लघु पाठबंधारे विभाग स्थानिकस्तर तथा लघु पाठबंधारे विभाग कार्यकारी अभियंता उपस्थित होते. हे दोन्ही कार्यकारी अभियंता एकमेकांकडे बोट दाखवित होते. एकमेकांना माझ्या अधिकार क्षेत्रात हा तलाव नाही, असे सांगत होते. या तलावावर शेतकऱ्यांची मालकी आहे. टेमणी, मांगली, मोहाडी खापा, सिंदपुरी गावातील शेतकऱ्यांची शेती आहे. तलावांच्या पाळीचे रोहयो अंतर्गत मातीकाम करण्यात आले आहे. संततधार पावसाने पाळ फुटल्यामुळे नुकसान झाले. आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.