शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:29 IST

यावर्षी २० जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही कुठ पडतो तर कुठ पडत नाही.

पावसाची प्रतीक्षा : शामकुंवर यांचे शेतकऱ्यांना आवाहनसाकोली : यावर्षी २० जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही कुठ पडतो तर कुठ पडत नाही. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथे १ ते १५ जुनपर्यंत सरासरी पाऊस ३२ मिमी असतो पंरतु यावर्षी १ ते १५ जून २०१६ या काळात फक्त ३.४ मिमी पाऊस पडला. हा पाऊस कोरडवाहू क्षेत्रात धान पेरणीसाठी समाधान कारक नाही. त्यामुळे कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या, असे आवाहन भात पैदासकार डॉ.बी.जी शामकुंवर यांनी केले आहे. १६ ते ३० जूनपर्यंत सरासरी पाऊस १६०.३९ मिमी पडतो, परंतु यावर्षी १६ ते २३ जूनपर्यंत फक्त १७ मिमी पाऊस बरसला आहे. २२ ते ३० जून २०१६पर्यंत १४४.७९ मिमी पाऊस अपेक्षित आहे. ओलिताची सोय (बोअरवेल, विहीर) असलेल्या शेतकऱ्यांनी धान बियाणे पेरणी केली असून काही ठिकाणी सुरु आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नाही त्यांनी अजूनपर्यंत पेरणी केली नसून पावसाची वाट बघत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी २२ ते २५ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडल्यास पेरणी करावी. यामध्ये कमी कालावधीच्या लवकर निघणाऱ्या ११५-१२० दिवसाच्या धान वाणांना प्राधान्य द्यावा. कृपया मध्यम कालावधी जसे १३०-१३५ दिवस व उशिरा कालावधी १३६-१४५ दिवसाच्या धान वाणाची पेरणी सुरु करु नये. ११५ ते १२० दिवस कालावधीचे धान वाण २२ ते २५ जूनपर्यंत पेरणी केल्यास व या काळात चांगला पाऊस झाला व त्यानंतर रोवणी २० ते २५ दिवसाच्या रोपांची केल्यास हे पिक १३ ते २४ सप्टेंबर दरम्यान फुलोऱ्यात येईल. कुबेरा अवस्था, त्या अगोदर व त्यानंतर १५ दिवस धान पिकाला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. ५ ते १० सेमी पाण्याची पातळी, ते सहजपणे उपलब्ध होण्याची शक्यता असते व हे पीक २४ आॅक्टोबरपर्यंत कापणीसाठी तयार होऊन समाधानकारक उत्पादन मिळते. ओलीताची सोय नसणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी १२५ ते १४५ दिवसपर्यंत कालावधीच्या धान वाणांची निवड व प्रेरणी करु नये कारण सप्टेंबर नंतर परतीच्या पाउसाला सुरुवात होते. १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत सरासरी पाऊस ६९.२७ मिमी असतो व त्यानंतर १ ते १५ आॅक्टोंबर पर्यंत २०.८८ मिमी पाऊस पडतो. उशिरा कालावधीचे वाण या कालावधीत फुलोरा अवस्थेत असतात व त्यांना पाण्याचा ताण पडतो. उत्पादनात घट येते. शेतकरी बांधवांनी जमीन तयार असल्यास रोपवाटिका (पऱ्हेखणी) तयार करुन १ मीटर रुंद, १० सेमी उंच व योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करुन ठेवावे, समजा २ ते ४ दिवसात सतत पाऊस पडल्यास व नंतर उघाड दिल्यास गादीवाफ्यावर बियाणांची पेरणी करणे सोपे जाते. शेतकरी चिखलपऱ्हे टाकतात. त्यामध्ये रोपे उपटतानी त्यांची मुळे तुटतात व रोपांना इजा होते व रोवणी झालेली बरीच रोपे मरतात. माहितीसाठी कृषी संशोधन केंद्र साकोली किंवा जवळच्या तालुका मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्कसाधावा असे आवाहन डॉ. बी.जी शामकुंवर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)