शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 4:03 PM

सिंचन करताना अडचणी: महावितरण विरोधात शेतकऱ्यांत रोष

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी देताना अडचणी येत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. सध्या भाजीपाल्याला भाव चांगला आहे. आगामी दिवसांमध्ये भाजीपाल्याचे भाव वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी दिवसरात्र मेहनत करून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, धारगाव क्षेत्रात तासनतास भारनियमन करण्यात येत आहे. सध्या भंडारा तालुक्यात ४२ डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे. या तापमानात पिके सुकत आहे. मात्र, यावेळीच भारनियमन करण्यात येत आहे. महावितरणने वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गावांमध्येही वीजपुरवठा खंडितगावांमध्ये सध्या विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. दररोज खंडित वीज पुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या कडक उन्हाळा चालू असून, विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना बऱ्याच वेळा रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज सतत खंडित होत असल्यामुळे वृद्ध व्यक्त्ती, लहान मुले यांना फार त्रास होत आहे. ते नीट झोपतही नाहीत. उन्हाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्षअनेक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपली व्यथा सांगत नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

धारगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. त्याकरिता हजारो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, वीजपुरवठा खंडित राहत असल्याने पिके सुकत आहे. परिणामी वाढत्या भावाचा फायदा होत नसून, लागवडीचा खर्चही व्यर्थ जात आहे.- धनराज कायते, शेतकरी

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीPower Shutdownभारनियमन