शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

‘त्या’ कुटुंबीयांना मिळणार पेन्शनचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:00 AM

भंडारा जिल्ह्यातील कृषी विभाग, शिक्षण विभाग, महसूल, वनविभागासह इतर विभागातील २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३५ च्या घरात आहे. या कुटुंबियांना असंख्य अडचणी येत असून कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता.

ठळक मुद्देशासन अध्यादेश काढणार : २००५ नंतरच्या चार हजार लाभार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात विविध मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात आंदोलने, संप पुकारल्यानंतर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे २००५ नंतरच्या मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. २००५ नंतर शासनसेवेत दाखल झालेल्या राज्यातील सुमारे चार हजार कुटुंबियांना संकटांचा सामना करावा लागत होता. अखेर त्यांना न्याय मिळणार आहे.भंडारा जिल्ह्यातील कृषी विभाग, शिक्षण विभाग, महसूल, वनविभागासह इतर विभागातील २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३५ च्या घरात आहे. या कुटुंबियांना असंख्य अडचणी येत असून कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. परंतु शासनाने शासकीय, निमशासकीय शिक्षण शिक्षकेत्तर समिती, जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत वित्त राज्य मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांच्या मृत कुटुंबियांना पेंशन लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच यासंबधी अध्यादेश काढणार असल्याचे जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष संतोष मडावी, महेश ईखारी यांनी सांगितले.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या शासकीय कर्मचाºयांसाठी शासनाने १९८२-८४ ची जुनी पेंशन योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना सुरू केली. यामध्ये कुटुंबाच्या वारसाला कोणत्याही पेंशन योजनेचा तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी, अथवा ग्रॅज्युईटीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटुंबे पेंशनसाठी न्यायाच्या प्रतिक्षेत होती. त्या सर्वं कुटुंबांना शासनाने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पेंशनचा निर्णय घेतल्याने आनंद द्विगुणीत झाला आहे. नेतृत्व समन्वयक समितीचे पदाधिकारी महेश ईखारे, संतोष मडावी, परमेश्वर येणकीकर, ईश्वर नाकाडे, युवराज वंजारी, राजेश डोर्लीकर, गोपाल मेश्राम, ओ.पी. गायधने, प्रभू मते, दिगांबर गभने, विजय ठाकूर, सुधीर माकडे, कालिदास माकडे, सुधाकर देशमुख, अशोक वैद्य, राजेश धुर्वे, सचिन कुकडे, संजय पंचबुद्धे, महिला पदाधिकारी निर्मल भोंगाडे, वनिता सार्वे, अंजली घरडे यांनी केले.अखेर मिळाला दिलासाशासनाने शासकीस, निमशासकीय सेवेत २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाºयांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना डीसीपीएस, एनपीएस सुरू केली. संपूर्ण राज्यात २००५ नंतर सेवेतील चार हजार कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. त्यात भंडारा जिल्ह्यातील कृषी, महसूल, वनविभाग, प्राथमिक शिक्षक अशा विविध विभागातील ३० कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने ते कुटुंबिय अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. एकीकडे आमदार, खासदारांना ५ वर्षाच्या निवृत्तीनंतर लगेच पेंशन योजना सुरू होते. परंतु अनेक वर्षे शासकीय सेवेत घालवल्यानंतरही आज या कुटुंबाची फरफट होत आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन