शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पवनी-भंडारा मार्गावर प्रवाशांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

दरम्यान, आंतर जिल्ह्यातील प्रवाशांना पर्यटन स्थळ असलेल्या भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी, गोसेखुर्द धरण, उमरेड-पवनी-करांडला व्याघ्र प्रकल्प, पवनीतील धार्मिक मंदिरे, सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप, वैजेश्वर मोक्षधाम आदींना भेटी देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सातत्याने या मार्गावर बससेवेअंतर्गत येता जाताना दिसत असल्याची देखील माहिती आहे.

ठळक मुद्देसुरळीत बसफेरीची मागणी: राज्य परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा व पवनी आगारांतर्गत परिवहन महामंडळाने नियमित बससेवा सुरू केली असली तरी वेळेवर पवनी-भंडारा या मार्गावरील प्रवाशांना एसटी बससेवा उपलब्ध होत नसल्याने डोकेदुखी ठरल्याचा आरोप होत आहे. परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा ठपका अनेक प्रवाशांनी ठेवला आहे.पवनी आगाराअंतर्गत भंडारा येथे जाणाऱ्या अनेक बसेस असल्याचा कांगावा केल्या जात असल्याची माहिती आहे. आंतर जिल्ह्यातील प्रवाशांचे केंद्रस्थान व ऐतिहासिक वारसा असलेल्या पवनी येथून बहुसंख्य प्रवासी सातत्याने भंडारा व गोंदियाकडे प्रवास करीत असतात. पवनी एसटी बस आगार असल्याने या स्थानकावरून नियमित बससेवा सुरू असते, अशी हमखास खात्री प्रवाशात असली तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. दोन-दोन तास विद्यार्थी, प्रवाशांना ताटकळत बसेसच्या प्रतीक्षेत वाट पाहात उभे राहावे लागते. जिल्ह्याचे स्थान म्हणून भंडाराकडे जात असताना या आगारांतर्गत पर्याप्त बससेवा उपलब्ध नसल्याचा आरोपही अनेक प्रवाशांनी केला. तब्बल ४२ किलोमीटर अंतराच्या पवनी ते भंडारा या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असताना बससेवा देखील प्रवाशांच्या कामी येत नसल्याने सारे प्रवासी हताश झाल्याचे दिसून येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना ऐनवेळी बससेवा उपलब्ध होत नसल्याने परिवहन महामंडळाविरोधात सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.दरम्यान, आंतर जिल्ह्यातील प्रवाशांना पर्यटन स्थळ असलेल्या भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी, गोसेखुर्द धरण, उमरेड-पवनी-करांडला व्याघ्र प्रकल्प, पवनीतील धार्मिक मंदिरे, सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप, वैजेश्वर मोक्षधाम आदींना भेटी देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सातत्याने या मार्गावर बससेवेअंतर्गत येता जाताना दिसत असल्याची देखील माहिती आहे. मात्र, या पर्यटकांसह प्रवाशांना वेळेत बससेवा उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रवाशांची कुचंबणा होत असताना परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप जनतेतर्फे केला जात आहे.भंडारा-पवनी या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होत असताना प्रवाशांसाठी रस्ता बांधकामाअभावी प्रवास खातर झाल्याची चर्चा आहे.मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाºया बहुतेक प्रवाशांना नियमित वेळेत बससेवा उपलब्ध होत नसल्याने अनेक शासकीय, प्रशासकीय कामे खोळंबली जात असल्याचे देखील आरोपात्मक प्रवाशी जनतेनी बोलून दाखविले.पवनी आगाराअंतर्गत पवनी-भंडारा मार्गावर जादा बससेवा सुरू केल्यास विद्यार्थी जनतेसह शासकीय, प्रशासकीय कामे उरकण्यासाठी जाणाºया प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी जनतेत केली जात असून पवनी-भंडारा मार्गावर जादा बससेवा सुरू करावी तसेच एकामागोमाग लागणाºया तीन-चार एसटी बस गाड्या आवश्यक अंतर ठेवून सोडाव्यात, अशीही मागणी प्रवाशी जनतेनी केली आहे.

टॅग्स :state transportएसटी