शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

आता पूर्व भागातील उड्डाणपूल मार्गातून राख गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 10:03 PM

तुमसर-खापा मार्गावरील पोचमार्गातून राखेची गळती सुरू होती. दोन्ही पोचमार्ग येथे धोकादायक ठरले आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या देव्हाडी गावातून गोंदियाकडे जाणाऱ्या पोचमार्गाची कामे सुरू आहे. भरावात येथे राख घातली गेली. पाऊस बरसल्याने नवनिर्मित पोचमार्गातून मोठ्या प्रमाणात राखेची गळती सुरू आहे.

ठळक मुद्देदेव्हाडी येथील प्रकार : प्रशासन मूग गिळून गप्प, कंत्राटदार व अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी-गोंदिया मार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल पोचमार्गातून मोठ्या प्रमाणात राखेची गळती सुरू आहे. यापूर्वी तुमसर-खापा मार्गावरील पोचमार्गातून राखेची गळती सुरू होती. दोन्ही पोचमार्ग येथे धोकादायक ठरले आहे.तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या देव्हाडी गावातून गोंदियाकडे जाणाऱ्या पोचमार्गाची कामे सुरू आहे. भरावात येथे राख घातली गेली. पाऊस बरसल्याने नवनिर्मित पोचमार्गातून मोठ्या प्रमाणात राखेची गळती सुरू आहे. राखेच्या गळतीमुळे उड्डाणपूलाचा पोचमार्ग पोकळ होण्याची शक्यता अधिक आहे. वाहून गेलेल्या स्थळावर कंत्राटदार पुन्हा राखेचा भराव करीत आहे, परंतु कायमस्वरूपी राखेची गळती थांबविण्याच्या उपाययोजना संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही. सदर प्रकरणी स्थानिक कंत्राटदारांची तांत्रिक पथक काहीच बोलायला तयार नाही. याविषयी परिसरातील अनेकांनी चूक लक्षात आणल्यानंतरही स्थिती जैसे थे आहे.उड्डाणपूल बनला चर्चेचा विषयराष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल राख गळतीमुळे चर्चेत आला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयापर्यंत लेखी तक्रारी दिल्या. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदारांपर्यंत तक्रारी पोहचल्या. प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु चौकशी झाली नाही. नागरिकांत येथील उड्डाणपूल चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिकांनी उड्डाणपूलावरून वाहतूक करू नये, असा निर्णय घेतला आहे, हे विशेष.रस्त्यावरील राख देताहे अपघाताला आमंत्रणराख रस्त्यावर पसरल्याने रस्ता निसरडा झाला आहे. दुचाकी व चारचाकी वाहने येथे अनियंत्रित होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. पावसाळ्यात येथे दुचाकीस्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. साखर कारखान्यातील कर्मचारी संजय बावनकर थोडक्यात बचावले. येथे संबंधित विभाग व कंत्राटदार आमचे काहीच होत नाही, असे निर्ढावलेले असून प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. पांदन रस्त्याची तक्रार झाल्यावर प्रशासन खळबळून जागा होते. येथे राष्ट्रीय महामार्गावरील पूल बांधकामाची कुणीच दखल घेत नाही. हा संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा