शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

आता पूर्व भागातील उड्डाणपूल मार्गातून राख गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:03 IST

तुमसर-खापा मार्गावरील पोचमार्गातून राखेची गळती सुरू होती. दोन्ही पोचमार्ग येथे धोकादायक ठरले आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या देव्हाडी गावातून गोंदियाकडे जाणाऱ्या पोचमार्गाची कामे सुरू आहे. भरावात येथे राख घातली गेली. पाऊस बरसल्याने नवनिर्मित पोचमार्गातून मोठ्या प्रमाणात राखेची गळती सुरू आहे.

ठळक मुद्देदेव्हाडी येथील प्रकार : प्रशासन मूग गिळून गप्प, कंत्राटदार व अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी-गोंदिया मार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल पोचमार्गातून मोठ्या प्रमाणात राखेची गळती सुरू आहे. यापूर्वी तुमसर-खापा मार्गावरील पोचमार्गातून राखेची गळती सुरू होती. दोन्ही पोचमार्ग येथे धोकादायक ठरले आहे.तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या देव्हाडी गावातून गोंदियाकडे जाणाऱ्या पोचमार्गाची कामे सुरू आहे. भरावात येथे राख घातली गेली. पाऊस बरसल्याने नवनिर्मित पोचमार्गातून मोठ्या प्रमाणात राखेची गळती सुरू आहे. राखेच्या गळतीमुळे उड्डाणपूलाचा पोचमार्ग पोकळ होण्याची शक्यता अधिक आहे. वाहून गेलेल्या स्थळावर कंत्राटदार पुन्हा राखेचा भराव करीत आहे, परंतु कायमस्वरूपी राखेची गळती थांबविण्याच्या उपाययोजना संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही. सदर प्रकरणी स्थानिक कंत्राटदारांची तांत्रिक पथक काहीच बोलायला तयार नाही. याविषयी परिसरातील अनेकांनी चूक लक्षात आणल्यानंतरही स्थिती जैसे थे आहे.उड्डाणपूल बनला चर्चेचा विषयराष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल राख गळतीमुळे चर्चेत आला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयापर्यंत लेखी तक्रारी दिल्या. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदारांपर्यंत तक्रारी पोहचल्या. प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु चौकशी झाली नाही. नागरिकांत येथील उड्डाणपूल चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिकांनी उड्डाणपूलावरून वाहतूक करू नये, असा निर्णय घेतला आहे, हे विशेष.रस्त्यावरील राख देताहे अपघाताला आमंत्रणराख रस्त्यावर पसरल्याने रस्ता निसरडा झाला आहे. दुचाकी व चारचाकी वाहने येथे अनियंत्रित होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. पावसाळ्यात येथे दुचाकीस्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. साखर कारखान्यातील कर्मचारी संजय बावनकर थोडक्यात बचावले. येथे संबंधित विभाग व कंत्राटदार आमचे काहीच होत नाही, असे निर्ढावलेले असून प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. पांदन रस्त्याची तक्रार झाल्यावर प्रशासन खळबळून जागा होते. येथे राष्ट्रीय महामार्गावरील पूल बांधकामाची कुणीच दखल घेत नाही. हा संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा