शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. त्याच काळात भंडारा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारचे सर्व जुलमी व अन्य करणारे कायदे मोडणे हा मुख्य हेतू या सत्याग्रहाचा होता. मिठाप्रमाणे गवतावर इंग्रज सरकारने कर आकारला होता. त्याचा निषेध म्हणून सत्याग्रह करण्यात आला. ८ ऑगस्ट १९३० रोजी तुमसर जवळच्या चिचोली (गोबरवाही) येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात, या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण यावी अशी अवस्था पूर्व विदर्भातील जंगल सत्याग्रहाच्या स्मारकाची झाली आहे. तुमसर तालुक्यातील चिचोली येथे ८ ऑगस्ट १९३० साली जंगल सत्याग्रह करण्यात आला. परंतु या सत्याग्रहस्थळी आता शासनाने लाकूड आगार उभारला आहे. या स्थळाचा शासनालाच काय जिल्ह्यातील नागरिकांनाही विसर पडला आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. त्याच काळात भंडारा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारचे सर्व जुलमी व अन्य करणारे कायदे मोडणे हा मुख्य हेतू या सत्याग्रहाचा होता. मिठाप्रमाणे गवतावर इंग्रज सरकारने कर आकारला होता. त्याचा निषेध म्हणून सत्याग्रह करण्यात आला. ८ ऑगस्ट १९३० रोजी तुमसर जवळच्या चिचोली (गोबरवाही) येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. असंख्य नागरिक, स्त्रिया, मुले गवत कापण्यासाठी निघाले. दुपारी सत्याग्रहाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पोलिसांचा ताफा तेथे हजर होता. गवत कापायला सुरुवात केल्यावर सर्वांना अटक करण्यात आली. त्यानंतर खटले भरण्यात आले. खटल्याचे काम विनायक पेटकर व पळसुले या तरुण वकिलानी विनामूल्य चालविले. खटल्याच्या निकाल लागून बहुतेकांना शिक्षा झाली. जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व फुलचंदजी अग्रवाल, चतुर्भुज जसानी, जगन्नाथ पटवर्धन, सत्यनारायण खंडेलवाल, मोरेश्वर दामले यांनी केले होते.तुमसरवरून अनेक कार्यकर्त्यांनी भंडारा येथे जाऊन जंगल लिलाव व दारू लिलाव यावर बहिष्कार व पीकेटिंग केले. यात पोलिसांनी लाठीमार व धरपकड सुरू केली. यात मो.प. दामले, वासुदेव कोंडेवार, कल्लू हलवाई, हरिश्चंद्र भोले, बालाजी पैलवान, बापू समरीत यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. 

जंगल सत्याग्रह स्थळ उपेक्षित- जंगल सत्याग्रह चिंचोली गावाजवळ बघेडा फाटा परिसरात झाला होता. महाराष्ट्र शासनाने तिथे आता लाकडांचा आगार तयार केला आहे. आज तेथे हजारो लाकडे पडून आहेत. ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन पुकारणारे स्थळ आजही उपेक्षित असून त्याच्या कोणत्याही खुणा तिथे नाहीत. आजच्या तरुणांना या ठिकाणी काय घडले हे माहीत नाही. किमान शासनाने तिथे फलक लावून इतिहासाची माहिती देणारे स्मारक तयार करण्याची गरज आहे.

धरपकड करून कारागृहात डांबले- भंडाऱ्याचे कलेक्टर व पोलीस अधीक्षकांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला होता. घोडेस्वार आणले होते. सत्याग्रहींना पकडल्यानंतर जमावाचे पुढारी कर्मवीर बापूजी पाठक, चतुर्भुज जसानी, गोपीचंद पाटील यांना अटक करण्यात आले. त्यांना पवनारच्या जंगल नाक्यात सर्वांना न्यायाधीशांनी शिक्षा दिली. त्यानंतर सर्वांना भंडारा येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तुमसरचे माकडे गुरुजी, बुधरामजी गुरुजी, वासुदेव कोंडेवार, प्रभाकरराव पेंढारकर, हरिश्चंद्र भोले अशा अनेक कार्यकर्त्यांना पकडून जेलमध्ये नेण्यात आले होते. १९३० अखेर सर्वांची जेलमधून सुटका झाली. 

 

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल