शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. त्याच काळात भंडारा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारचे सर्व जुलमी व अन्य करणारे कायदे मोडणे हा मुख्य हेतू या सत्याग्रहाचा होता. मिठाप्रमाणे गवतावर इंग्रज सरकारने कर आकारला होता. त्याचा निषेध म्हणून सत्याग्रह करण्यात आला. ८ ऑगस्ट १९३० रोजी तुमसर जवळच्या चिचोली (गोबरवाही) येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात, या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण यावी अशी अवस्था पूर्व विदर्भातील जंगल सत्याग्रहाच्या स्मारकाची झाली आहे. तुमसर तालुक्यातील चिचोली येथे ८ ऑगस्ट १९३० साली जंगल सत्याग्रह करण्यात आला. परंतु या सत्याग्रहस्थळी आता शासनाने लाकूड आगार उभारला आहे. या स्थळाचा शासनालाच काय जिल्ह्यातील नागरिकांनाही विसर पडला आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. त्याच काळात भंडारा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारचे सर्व जुलमी व अन्य करणारे कायदे मोडणे हा मुख्य हेतू या सत्याग्रहाचा होता. मिठाप्रमाणे गवतावर इंग्रज सरकारने कर आकारला होता. त्याचा निषेध म्हणून सत्याग्रह करण्यात आला. ८ ऑगस्ट १९३० रोजी तुमसर जवळच्या चिचोली (गोबरवाही) येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. असंख्य नागरिक, स्त्रिया, मुले गवत कापण्यासाठी निघाले. दुपारी सत्याग्रहाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पोलिसांचा ताफा तेथे हजर होता. गवत कापायला सुरुवात केल्यावर सर्वांना अटक करण्यात आली. त्यानंतर खटले भरण्यात आले. खटल्याचे काम विनायक पेटकर व पळसुले या तरुण वकिलानी विनामूल्य चालविले. खटल्याच्या निकाल लागून बहुतेकांना शिक्षा झाली. जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व फुलचंदजी अग्रवाल, चतुर्भुज जसानी, जगन्नाथ पटवर्धन, सत्यनारायण खंडेलवाल, मोरेश्वर दामले यांनी केले होते.तुमसरवरून अनेक कार्यकर्त्यांनी भंडारा येथे जाऊन जंगल लिलाव व दारू लिलाव यावर बहिष्कार व पीकेटिंग केले. यात पोलिसांनी लाठीमार व धरपकड सुरू केली. यात मो.प. दामले, वासुदेव कोंडेवार, कल्लू हलवाई, हरिश्चंद्र भोले, बालाजी पैलवान, बापू समरीत यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. 

जंगल सत्याग्रह स्थळ उपेक्षित- जंगल सत्याग्रह चिंचोली गावाजवळ बघेडा फाटा परिसरात झाला होता. महाराष्ट्र शासनाने तिथे आता लाकडांचा आगार तयार केला आहे. आज तेथे हजारो लाकडे पडून आहेत. ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन पुकारणारे स्थळ आजही उपेक्षित असून त्याच्या कोणत्याही खुणा तिथे नाहीत. आजच्या तरुणांना या ठिकाणी काय घडले हे माहीत नाही. किमान शासनाने तिथे फलक लावून इतिहासाची माहिती देणारे स्मारक तयार करण्याची गरज आहे.

धरपकड करून कारागृहात डांबले- भंडाऱ्याचे कलेक्टर व पोलीस अधीक्षकांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला होता. घोडेस्वार आणले होते. सत्याग्रहींना पकडल्यानंतर जमावाचे पुढारी कर्मवीर बापूजी पाठक, चतुर्भुज जसानी, गोपीचंद पाटील यांना अटक करण्यात आले. त्यांना पवनारच्या जंगल नाक्यात सर्वांना न्यायाधीशांनी शिक्षा दिली. त्यानंतर सर्वांना भंडारा येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तुमसरचे माकडे गुरुजी, बुधरामजी गुरुजी, वासुदेव कोंडेवार, प्रभाकरराव पेंढारकर, हरिश्चंद्र भोले अशा अनेक कार्यकर्त्यांना पकडून जेलमध्ये नेण्यात आले होते. १९३० अखेर सर्वांची जेलमधून सुटका झाली. 

 

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल