शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

लाखनीत घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:38 IST

येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

ठळक मुद्देडम्पिंग यार्डचा अभाव : रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.नगर पातळीवर कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, कचरा वर्गीकरण, कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट आदी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत एकुण निधीच्या दहा टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापनावर वापरता येते. घनकचºयाचे निर्मुलन करताना कचरा निर्मितीच्या जागा व त्यानुसार व्यवस्थेचा विचार केला जातो. घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने आठवडी बाजार, शाळा, मंदिर, लग्नसमारंभ आदी ठिकाणी भरपूर केरकचरा निर्माण होतो. घनकचराची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणारे घनकचराचे प्रमाण व त्याचा दर्जावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी त्याची साठवण, वाहतुक व्यवस्था व त्यावरिल प्रक्रियेचे डिझाईन लाखनी नगर पंचायतीजवळ तयार नाही.लाखनी नगरपंचायतीने कोट्यवधीचा निधी सिमेंट रस्ते, नाल्या तयार करण्यावर खर्च केला आहे. शासन स्वच्छता मोहीमेवर भर देत आहे. परंतु नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कचºयामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकला जातो त्या परिसरातील नागरिकांना राहणे कठीण झाले आहे.नगरसेवक धनु व्यास म्हणाले, शहरापासून सात-आठ किलोमिटर अंतरावर डम्पिंग यार्ड असण्याचा नियम आहे. काही लोक हेतुपरस्सर कचºयाच्या ढिगाºयाला आग लावतात. नगर पंचायत स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवित आहे.डम्पिंग यार्डच्या जागेचे भिजत घोंगडेलाखनी नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन ते पाच एकर जमीन हवी आहे. शहराच्या आसपास एवढीमोठी शासकीय जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे खाजगी जमीन विकत घेण्याची निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात गेला आहे. जमीन खरेदी-विक्रीचा प्रस्तावाला अंतीम रुप मिळाले नाही. लाखनीची लोकसंख्या १२ हजार आहे. प्रत्येक प्रभागात कुंड्या आहेत. गल्लोगल्लीत कचरा गोळा करण्याचे डब्बे आहेत. घराघरात प्रत्येक कुटूंबाला डस्टबिन दिले आहेत. परंतु गोळा झालेल्या कचºयाचे काय करावे हा नेमका प्रश्न आहे.

टॅग्स :dumpingकचरा