शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कमकासुरात 'काळी' दिवाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 21:45 IST

बावनथडी प्रकल्पात बेघर झालेल्या कमकासुरवासीयांचे करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात कोणतीही नागरी सुविधा पुरविल्या गेली नसल्याने प्रकल्पग्रस्त आदिवासी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले.

ठळक मुद्देटाहो फोडणार : जिल्ह्यातील आदिवासी संघटना एकवटल्या

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पात बेघर झालेल्या कमकासुरवासीयांचे करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात कोणतीही नागरी सुविधा पुरविल्या गेली नसल्याने प्रकल्पग्रस्त आदिवासी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. परंतु प्रशासनाने थातूरमातूर दखल घेतल्याचे दर्शवून आदिवासीयांची एक प्रकारे बोळवण केली आहे. परिणामी दोन दिवस शासन व प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या विरोधात टाहो फोडून कमकासुरात काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा निर्धार आदिवासींनी केला आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशाला जोडणाºया महत्वकांशी बावनथडी प्रकल्पात बाधीत होणाºया गावाचे शासनामार्फत तुटपुंजी मदत सन २००६ मध्ये जमिनीचा अवार्ड करून जमिन अधिग्रहन करण्यात आली. त्यावेळी ही गावकºयांनी विरोधच केला होता. मात्र शासनामार्फत आदिवासी यांना दिव्य स्वप्ने दाखविण्यात आली. सुशिक्षितांना नौकरी, अशिक्षीताना कौशल्य रोजगार, चांगले घरे, दिवाबत्तीची सोय, सांडपाण्याकरिता नाली, चांगले आरोग्य, उत्कृष्ठ शिक्षण अशा अनेक भुलथापा आदिवासी यांना देवून बंदुकीच्या धाकावर प्रकल्पाच्या गळभरणी करतेवेळेस जोर जबरदस्तीने त्यांच्या मुळ गावातून त्यांना हाकलण्यात आले. मात्र तितक्याच पोट तिडकिने, पुनर्वसित गावात एकही सुविधा पुरविली गेली नाही. उपजिविकेचे कोणतेच साधनही देण्यात आले नाही.परिणामी पुनर्वसन झालेल्या गावात आदिवासीयावर उपासमारीची वेळ ओढविल्यामुळे आदिवासीयांनी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावीच जाण्याचा संकल्प केला व ५ आॅक्टोबरला कुटुंबासह आदिवासी मुळ गाव कमकासुर येथे पोहचले.कमकासूर हे गाव तुमसर तालुक्याच्या ठिकाणापासून ७० कि़मी. अंतरावर घनदाट जंगलात आहे तिथे ये-जा करण्यासाठी रस्ते नाही, वीज नाही. त्यामुळे सायंकाळी ५ वाजताच रात्रीचे १० वाजल्याची अनुभती त्या ठिकाणी येते. ईतकेच नव्हे तर सदर परिसरात वाघ बिबट, रानडुक्कर, अस्वल सारखे जंगली व हिस्त्र प्राण्यांचा वावर तिथे आहे. अशा भयावह ठिकाणी आदिवासी गत १० दिवसापासून राहत आहे. मात्र प्रशासनाने आदिवासी यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केला. दरम्यान जलसमाधीचा इशारा देताच प्रशासनाचे अधिकारी कसे बसे पोहचले परंतू त्याने आदिवासीयांचा समाधान झाला नाही. जिल्हाधिकाºयाने स्वत: येवून आमच्या समस्या ऐकूण घ्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. परंतू त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे कमकासुरात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून काळी दिवाळी साजरी करणार आहेत.आंदोलनाला जिल्ह्यातील आदिवासी संघटनेने पाठींबा दिला आहे. आदिवासी बांधवांनी काळी दिवाळी साजरी करण्यावर एकमत झाले.-अशोक उईके, आदिवासी नेता.मुळगावी गेलेल्या आदिवासीयांचे जगणे कठिण झाले असून त्यांची उपासमार टाळण्याकरिता समाजसेवेच्या दृष्टकोनातून अन्यधान्य पुरविण्यास तोकडी मदत करित आहे.-तोफलाल राहांगडाले, माजी सरपंच डोंगरी बुज.जिल्हाधिकारी यांनी स्वत: येवून समस्या ऐकूण घ्याव्यात व तातडीने त्यावर उपाय योजना करावी, ऐवढेच म्हणने आहे.-किशोर उईके, सरपंच कमकापूर.