शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

बिरसामुंडा समाजासाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:31 IST

बिरसा मुंडा हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी सेवक कवी, विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केले.

ठळक मुद्देवामन शेळमाके : बिरसा मुंडा बलिदान दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बिरसा मुंडा हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी सेवक कवी, विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केले.आदिवासी अस्तित्व, अस्मिता अकादमी, भंडाराच्या वतीने क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या ११९ व्या बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी येथील जंगल कामगार संस्थेच्या सभागृहात मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, एनटी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी बळीराम उईके होते. अतिथी म्हणून प्रभूदास सोयाम, दामोदर नेवारे, माजी प्रा.पुरण लोणारे, डॉ.विनोद भोयर उपस्थित होते. संचालन जगदीश मडावी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कवी रमेशचंद्र सोमकुवर यांच्या माणूस नावाची कविता सादर करून करण्यात आली.आदिवासी अस्तित्व, अस्मिता अकादमीच्या वतीने प्रास्ताविक प्रा.डॉ.वामन शेळमाके, मांडतांना म्हणाले, ‘वंशविच्छेदनाच्या प्रक्रियेमुळे आदिवासी सकट मागासवर्गीय बहुजन समाजाला संपविण्याचे कार्य प्रस्थापित व्यवस्थेने केले आहे. याविरुद्ध बंड पुकारून जल, जंगल, जमीन चा प्रणेता युवा क्रांतीवीर बिरसा मुंडाच्या आंदोलनाने ब्रिटीश घाबरले होते. स्वातंत्र्याचा प्रथम उलगुलान करणारा महामानव युवा क्रांतीजननायक त्यावेळी बिरसा मुंडा होता. बिरसा मुंडाच्या बलिदानातून सर्वहारा समाजाने प्रेरणा घेऊन, संघटीत होऊन, संघर्ष करावा लागेल हीच खरी श्रद्धांजली ठरेल’.यानिमित्ताने सुसंवाद करणारे जगदीश मडावी, चिंतामन इडपाते, तुळशीराम कोडापे, प्रा.विनोद मेश्राम, कवी रमेशचंद्र सोमकुवर, राजेश सलाम, नरेश कोडापे, दिनेश नागभिरे, वसंत सोमकुंवर इत्यादी मान्यवरांनी समयोचित विचारांची मांडणी करून माणसाला समानतेच्या धाग्याने बांधून समाजाची अस्मिता जपली पाहिजे, असा सूर व्यक्त केला.मुख्य अतिथी माजी प्राचार्य पूरण लोणारे म्हणाले, ‘मागासवर्गीय समाजाने संघटीत होवून लोकशाही मुल्याची जपणूक करणे काळाची गरज आहे’.अतिथी दामोदर नेवारे यांनी आदिवासी समाजात गोवारी जमात समाविष्ट असूनही न्याय का मिळत नाही? यासाठी लढा उभारून सर्वहास समाजाने संघटीत होवून संघर्षाची वाट तीव्र करावी लागेल. अन्यथा आपले अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी समाजाचे प्रभूदास सोयाम यांनी आदिवासीच्या अस्तित्व, अस्मितासाठी लढत राहणे ही आवश्यक बाब असून सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.बळीराम उईके म्हणाले, ‘आदिवासी समाजात एकजुट नाही, शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. मतभेद व एकजुट नसल्याने आदिवासी समाजाचे शोषण, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. बलिदान दिवसाच्या निमित्ताने सर्व मागासवर्गीय समाजाने आदिवासी समाजाला सहकार्य केले तर नक्कीच परिवर्तन होवून आदिवासींना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती.