शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बिरसामुंडा समाजासाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:31 IST

बिरसा मुंडा हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी सेवक कवी, विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केले.

ठळक मुद्देवामन शेळमाके : बिरसा मुंडा बलिदान दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बिरसा मुंडा हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी सेवक कवी, विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केले.आदिवासी अस्तित्व, अस्मिता अकादमी, भंडाराच्या वतीने क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या ११९ व्या बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी येथील जंगल कामगार संस्थेच्या सभागृहात मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, एनटी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी बळीराम उईके होते. अतिथी म्हणून प्रभूदास सोयाम, दामोदर नेवारे, माजी प्रा.पुरण लोणारे, डॉ.विनोद भोयर उपस्थित होते. संचालन जगदीश मडावी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कवी रमेशचंद्र सोमकुवर यांच्या माणूस नावाची कविता सादर करून करण्यात आली.आदिवासी अस्तित्व, अस्मिता अकादमीच्या वतीने प्रास्ताविक प्रा.डॉ.वामन शेळमाके, मांडतांना म्हणाले, ‘वंशविच्छेदनाच्या प्रक्रियेमुळे आदिवासी सकट मागासवर्गीय बहुजन समाजाला संपविण्याचे कार्य प्रस्थापित व्यवस्थेने केले आहे. याविरुद्ध बंड पुकारून जल, जंगल, जमीन चा प्रणेता युवा क्रांतीवीर बिरसा मुंडाच्या आंदोलनाने ब्रिटीश घाबरले होते. स्वातंत्र्याचा प्रथम उलगुलान करणारा महामानव युवा क्रांतीजननायक त्यावेळी बिरसा मुंडा होता. बिरसा मुंडाच्या बलिदानातून सर्वहारा समाजाने प्रेरणा घेऊन, संघटीत होऊन, संघर्ष करावा लागेल हीच खरी श्रद्धांजली ठरेल’.यानिमित्ताने सुसंवाद करणारे जगदीश मडावी, चिंतामन इडपाते, तुळशीराम कोडापे, प्रा.विनोद मेश्राम, कवी रमेशचंद्र सोमकुवर, राजेश सलाम, नरेश कोडापे, दिनेश नागभिरे, वसंत सोमकुंवर इत्यादी मान्यवरांनी समयोचित विचारांची मांडणी करून माणसाला समानतेच्या धाग्याने बांधून समाजाची अस्मिता जपली पाहिजे, असा सूर व्यक्त केला.मुख्य अतिथी माजी प्राचार्य पूरण लोणारे म्हणाले, ‘मागासवर्गीय समाजाने संघटीत होवून लोकशाही मुल्याची जपणूक करणे काळाची गरज आहे’.अतिथी दामोदर नेवारे यांनी आदिवासी समाजात गोवारी जमात समाविष्ट असूनही न्याय का मिळत नाही? यासाठी लढा उभारून सर्वहास समाजाने संघटीत होवून संघर्षाची वाट तीव्र करावी लागेल. अन्यथा आपले अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी समाजाचे प्रभूदास सोयाम यांनी आदिवासीच्या अस्तित्व, अस्मितासाठी लढत राहणे ही आवश्यक बाब असून सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.बळीराम उईके म्हणाले, ‘आदिवासी समाजात एकजुट नाही, शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. मतभेद व एकजुट नसल्याने आदिवासी समाजाचे शोषण, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. बलिदान दिवसाच्या निमित्ताने सर्व मागासवर्गीय समाजाने आदिवासी समाजाला सहकार्य केले तर नक्कीच परिवर्तन होवून आदिवासींना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती.